Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याने केला वांदा! शेतकऱ्यांची चिंता वाढली; दरात मोठी घसरण

सोलापूर बाजार समितीत समाधानकारक दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी बेंगलोर बाजाराकडे वळले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 21, 2024 | 04:09 PM
कांद्याने केला वांदा! शेतकऱ्यांची चिंता वाढली; दरात मोठी घसरण
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १०-१५ दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपयांचा सरासरी दर होता. सात हजारांवर दर गेला होता. परंतु आता सरासरी दर तब्बल दोन हजार रुपयांनी घसरला आहे. बुधवारी कांद्याला १८०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

सोलापूर बाजार समितीत बुधवारी ४३० गाड्या कांद्याची आवक होती. ४३ हजार ७७ क्विंटल कांद्यापैकी अवघा पाच क्विंटल कांदा चार हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. उर्वरित ४३ हजार ६८ क्विंटल कांद्याला सरासरी दर अठराशे रुपयांपर्यंतच मिळाल्याचे दिसून आले. बुधवारी बाजार समितीत कांद्याच्या विक्रीतून पावणेआठ कोटींची उलाढाल झाली. एवढीच आवक असताना मागील दहा दिवसांपूर्वी ११ कोटींपर्यत उलाढाल होती. दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पावसाळ्यात जागेवरच खराब झालेला कांदा काढून शेतकऱ्यांनी नवीन कांद्याची लागवड केली. त्यातून चार पैसे हाती पडतील, नुकसान भरून निघेल हा त्यामागील हेतू आहे. मात्र, कांद्याचे दर अचानकपणे कमी झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला. यंदा गतवर्षीपेक्षा कांद्याची आवक निम्म्याने कमीच आहे, तरीदेखील समाधानकारक भाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांना आहे.

हे सुद्धा वाचा : Pune Crime : पुण्यात आणखी एक संतापजनक प्रकार; शिक्षकाने केला विद्यार्थीनींचा विनयभंग

आवक वाढल्याने दरात झाली घसरण

सोलापूर बाजार समितीत समाधानकारक दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी बेंगलोर बाजाराकडे वळले आहेत. त्याठिकाणी जायला गाडी भाडे जास्त आहे, पण भाव देखील सरासरी तीन हजारांपर्यंत मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. गुजरात, आंध्र प्रदेशातील कर्नुल, लासलगाव, पुणे आणि नगर येथे कांदा आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सोलापुरातील भावात घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांत भाव वाढेल, असा विश्वास व्यापारी व्यक्त करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : सातव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

दरम्यान, किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेले आहेत. बटाटा, कांदा, टोमॅटो या दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर अजूनही 40 ते 60 रुपयांच्या घरात आहेत. त्याचबरोबर घाऊक बाजारात या भाज्यांचे दर सातत्याने घसरत असल्याने सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या किमतीचा वाटा ग्राहकांकडून आकारला जात नाही. बाजारात भाजीपाल्याची आवकही तेजीत आहे. परंतु, शेतकऱ्यांकडून स्वस्त दरात शेतमाल खरेदी करूनही भाजीपाला सर्वसामान्यांपर्यंत कमी दरात पोहोचत नाही.

Web Title: Farmers anxiety has increased due to a big fall in the price of onion nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Solapur News

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.