
काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, '७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले'; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० ते ७५ वर्षे जिहे-कटापूर योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला. या काळात शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला नवसंजीवनी देत हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामांना गती दिली. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाचे पाणी मिळून परिसरातील शेती समृद्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
रस्त्यांवर रम्बलर बसवण्याची घोषणा हवेतच विरली; म्हसवडकरांची प्रतिक्षा कायम राहिली
आमदार महेश शिंदे यांनीही विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना, या योजनेतून कोरेगावला पाणी मिळणार नसल्याचे दावे खोटे ठरल्याचे सांगितले. या प्रकल्पातून कोरेगावला २ टीएमसी पाणी मिळणार असून, माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्याचा मोठा भाग दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील १३ महिन्यांत या योजनेचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे यांनी या योजनेसाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे योगदान अधोरेखित केले. आ. महेश शिंदे यांनी दुष्काळमुक्तीसाठी राजकारणात प्रवेश केला असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात या परिसरात औद्योगिक कॉरिडॉर उभारला जाईल आणि स्थानिक युवकांना शेतीबरोबरच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला आमदार अतुल भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार धैर्यशील कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुनील खत्री, नंदगिरी महाराज यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satara News: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीसह वीज थकबाकी माफीचा लाभ