
पहिल्याच पावसाळ्यात सहा महिन्यांपूर्वी तयार केलेले रस्ते वाहून जात असतील, तर त्या रस्त्यांच्या गुणवत्तेची कल्पना करणे कठीण आहे. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक रस्त्यांच्या कामांची पोलखोल केली.
निकृष्ट बांधकामामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्ते आता मृत्यूचे सापळे ठरत आहे. गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यात लहान-मोठे २१५ हून अधिक अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १२४ जणांचा मृत्यू झाला असून, ११४ जण गंभीर जखमी तर ४२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आले. मात्र, एवढ्या गंभीर परिस्थितीनंतरही शासन आणि प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.
रस्ते बांधकामातील गुणवत्तेचा अभाव; ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती तर आणखी बिकट आहे. शासनाकडून रस्ते बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, त्यानंतरही रस्त्यांची गुणवत्ता कायम प्रश्नचिन्हाखाली आहे. बांधकाम साहित्याचा दर्जा, कामातील पारदर्शकता आणि देखभाल याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. रस्ते बांधकामातील अनियमितता, निकृष्ट साहित्याचा वापर आणि कथित कमिशन पद्धतीमुळे कामांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यातील सालेकसा, अर्जुनी-मोरगाव, देवरी, आमगाव तालुक्यांतील प्रमुख मार्गावरील पूल आणि रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. यातील काही पूल कालबाहा झाले असून, काही रस्त्यांचीही अशीच स्थिती आहे. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाची आहे.
जीर्ण झालेल्या पुलांचे वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट करून ते वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत की नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील किती पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले, याची माहिती संबंधित विभागांकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. आता स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असल्याचे विभागांकडून सांगण्यात आले आहे. रस्ते हे कोणत्याही भागाच्या विकासाचे प्रतिबिंब मानले
विकासाच्या वाटेवर खड्डेच खड्डे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची दुर्दशा कायम असेल, तर हा निधी नेमका कुठे खर्च होतो, याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांच्या जीवाशी संबंधित असलेल्या रस्ते आणि पुलांच्या कामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.