भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३० किमी रस्त्यांची दुरवस्था झाली असून शासनाकडून १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करून वाहतूक पूर्ववत केली आहे.
मानखुर्द - महाराष्ट्र नगर टी जंक्शन येथे नियमितपणे सकाळी आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीमुळे स्थानिक रहिवाशांसह मुंबई-वाशी दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
राज्यातील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्याच पावसात अनेक रस्ते आणि पूल खचल्याने नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालातील गंभीर निरीक्षणांची प्रचिती आल्याचे चित्र दिसत आहे.
मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांसाठी 'जीवनरेषा' मानला जाणारा बारातांडा ते धुळघाट (रेल्वे) हा १० किलोमीटरचा रस्ता सध्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण बनला आहे.
अडीच कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला तालुक्यातील देवळी ते भोरस या चार किलो मीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे प्रशासनावर नाराजी व्यक्त झाली.
नगर मनमाड रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यामुळे मागील 8 दिवसात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
कैकाडी गुड्यापासून मडावी गुड्यापर्यंत सुमारे ४०० मीटर रस्त्याच्या कडेला काही शेतकऱ्यांनी कुंपण केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी बाहेर न वाहता रस्त्यावर साचून चिखल तयार होतो. याच मार्गाने मुलांसह गावकरी प्रवास…