
Maharashtra Rain Alert: सावधान! 48 तास धोक्याचे? कोकणात पाऊस आक्रमक होणार, तर...
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी मान्सूनने मध्य अरबी समुद्राचा काही भाग, महाराष्ट्रातील अलिबाग व पुण्यासह आणखी काही क्षेत्रे तसेच तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमधील काही भाग व्यापले. सध्या मान्सूनची उत्तर सीमा अलिबाग, पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बालांगीर, सुंदरगड, छत्रा, गया आणि मुझफ्फरपूर येथून जात आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसासाठी पोषक वातावरण राहण्याचा अंदाज आहे. कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे कोकण-गोव्यातील सर्व जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि घाट परिसरात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert: ये रे ये रे पावसा! हवामानाचा लहरीपणा संपेननाच; ‘या’ जिल्ह्यांना…
पुणे शहर आणि परिसरात सोमवारी (ता.२२) कमाल तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअसने घट होऊन ते ३३ अंश सेल्सिअसवर नोंदविण्यात आले, तर किमान तापमान २३.७ अंश सेल्सिअस होते. दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण अनुभवास आले. मंगळवारी (ता.२३) कमाल तापमान स्थिर राहण्याची, तर किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर किंवा सायंकाळी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनामुळे तापमानात आणखी घट होऊन उकाड्यापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.