Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत होतीये वाढ; अवघ्या सात महिन्यांत ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

राज्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. वाढते अपघात आणि त्यातून होणारी प्राणहानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून, त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2023 | 08:04 AM
राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत होतीये वाढ; अवघ्या सात महिन्यांत ‘इतक्या’ जणांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. वाढते अपघात आणि त्यातून होणारी प्राणहानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून, त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. जानेवारी ते जुलै २०१३ या कालावधीत १९,७१९ अपघात झाले असून, या अपघातात ८,९०७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अपघात घटले असून पुण्यात वाढले आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातात १४६ ने तर मृत्यूंमध्ये ३८५ ने घट झाली आहे, सध्याच्या घडीला राज्यात तीन कोटी ४७ लाख ७३ हजार ६२५ वाहनांची नोंदणी झालेली आहे. देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून, हे अपघात कमी करण्यासाठी आरटीओसह वाहतूक पोलिस विविध योजना राबवीत आहेत. रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतून प्रवासी वाहतूक करणे, वेगाने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसविणे, गाडी चालवताना मोबाइलचा वापर करणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही कारणे आहेत. अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून, त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे.

मुंबईत ५५१ अपघात

मुंबईत एकूण ४३ लाखांहून अधिक चाहने आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये ५५१ अपघात झाले असून, या अपघातात १४८ जणांचा मृत्यू झाला. २०२२ च्या तुलनेत अपघातात ५९० नी घट, मृत्यूंमध्ये ६४ तर गंभीर जखमींची संख्या ४९२ ने कमी आहे.

पुण्यात ७०५ अपघात

पुण्यात गेल्या ५ वर्षाच्या तुलनेत यंदा अपघात व मृत्यू वाढले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ४९४ अपघातात १८९ लोकांचा मृत्यू झाला तर ३५२ जण जखमी झाले होते. यंदा सात महिन्यात ७०५ अपघातांत २०५ मृत्यू तर ५०२ जण जखमी झाले.

Web Title: Increase in the number of road accidents in the state so many died in just seven months nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2023 | 07:58 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Mumbai
  • NAVARASHTRA
  • Pune
  • Road Accidents

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
2

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
3

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
4

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.