Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न; पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद

कोल्हापूर महापालिकेवर गेली पाच वर्षे प्रशासकराज होते. त्यामुळे ड्रेनेज, पाणी, रस्ते, गटारी, अनुकंपा खालील नोकरी असे अनेक प्रश्न प्रलंबित होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 07, 2026 | 05:25 PM
Kolhapur News : जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न; पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद
Follow Us
Close
Follow Us:
  • जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न
  • पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद
कोल्हापूर /अहिल्या परकाळे : कोल्हापूर महापालिकेवर गेली पाच वर्षे प्रशासकराज होते. त्यामुळे ड्रेनेज, पाणी, रस्ते, गटारी, अनुकंपा खालील नोकरी असे अनेक प्रश्न प्रलंबित होते. परंतु आता महापौर रूपाराणी निकम यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. एवढेच नाही तर जनता दरबार घेऊन चक्क १३६ लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. यामध्ये अनेकांचे सार्वजनिक तर काहीजणांचे वैयक्तिक प्रश्न होते. हे प्रश्न का सुटत नाही म्हणून महापौर निकम यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत आठ दिवसात जनतेला न्याय मिळाला पाहिजे अशा सूचना दिल्या. जनता दरबारानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून जनसेवेच्या कामाला लागले आहे.गार्डन, अतिक्रमण, ड्रेनेज विभाग जनतेच्या रडारवर महापालिकेतील गार्डन, अतिक्रमण, ड्रेनेज विभाग जनतेच्या रडारवर आहे. जनता दरबारमध्ये नागरिकांनी थेट अधिकाऱ्यांना सवाल विचारले. जनसेवक असूनही अधिकारी अरेरावीची भाषा वापरतात,असा आरोप अनेक नागरिकांनी केला. एका ७५ वर्षाच्या आजोबांनी तर गांधी मैदान, भाजी मंडई, अतिक्रमणावर प्रश्नांचा भडीमार केला. कित्येकवेळ ते माईक सोडायला तयार नव्हते. अखेर त्यांच्याकडून माईक काढून घेण्यात आला.

Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम

मालिका प्रशासनाकडून आपल्या प्रभागात मूलभूत सुविधा एवढीच अपेक्षा असते. परंतु वर्षानुवर्षे पाठपुरावा केला तरी नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अधिकारी नागरिकांना भेटत नाहीत, भेटले तरी त्यांचे म्हणणे एकूण घेतले जात नाही. तसेच अर्ज दिला तरी त्यावर कोणताही ठोस निर्णय दिला जात नाही. काही बिल्डर सार्वजनिक जागेत अतिक्रमण करून इमारती उभा करतात. परंतु याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी जनता दरबारात केला. पहिल्याच जनत दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून प्रशासनावर रोष व्यक्त केला. यावन अधिकाऱ्यांनी पाहतो, बघतो असेच उत्तन महापौर यांना दिले. अनेकदा महापौरांनी तुम्हाला प्रत्येक वेळेस उत्तर द्या, असे सांगाव् लागते का असा सज्जड दम भरल्याचे पहिल मिळाले. दरवेळी आश्वासन दिले जाते पण फाईल पुढे का सरकत नाही, अर्श तीव्र नाराजीही व्यक्त केली.

जनतेचा पैसा वाया जाऊ देणार नाही
नागरिकांचे प्रश्न पंधरा दिवसात प्रश्न सुटले पाहिजेत. शाहू नगरीत आजही कचरा, पाणी, गटर असे प्रश्न आहेत, याची खंत वाटते, मी जनतेचा पैसा वाया जावू देणार नाही, प्रत्येक नागरिकाला न्याय देणार आहे. तुम्ही आत्महत्या करायची नाही, एखाद्याला आपण मारूया. एक महिन्यात तुमचे प्रश्न मार्गी लागतील.
– रुपाराणी निकम, महापौर, महापालिका, कोल्हापूर

माहिती अधिकाराखाली मिळवून उपोषण, आंदोलन, केले पण महापालिका प्रशासन निवेदन स्वीकारण्या पलीकडे काहीच करीत नाही. अनेकांनी तर अधिकारी, कर्मचारी कार्यालयात नसतात असे सांगितले.एकाने तर बिल्डर लोकांना अधिकारी सामील असल्याचा आरोप केला. एका महिलेने व्यावसायिक परवाना असूनही गाडी उचलून नेल्याचा आरोप केला.

यासंदर्भात महापौर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मोठ्या उद्योजकांनी केलेल्या अतिक्रमण का काढली नाहीत, असा जाब विचारला.
संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांला गाडी परत करण्याच्या सूचना दिल्या. न्यायालयीन प्रश्न वगळता वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची स्वतंत्र नोंद करून बैठक घेत त्यावर एक महिन्यात तोडगा काढण्याचे निर्देश दिले.

Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ

Web Title: Kolhapur news an attempt to awaken the administration to the peoples issues citizens response in the first janata darbar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • Navrashtra

संबंधित बातम्या

International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास
1

International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?
2

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान
3

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 
4

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.