
मालिका प्रशासनाकडून आपल्या प्रभागात मूलभूत सुविधा एवढीच अपेक्षा असते. परंतु वर्षानुवर्षे पाठपुरावा केला तरी नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अधिकारी नागरिकांना भेटत नाहीत, भेटले तरी त्यांचे म्हणणे एकूण घेतले जात नाही. तसेच अर्ज दिला तरी त्यावर कोणताही ठोस निर्णय दिला जात नाही. काही बिल्डर सार्वजनिक जागेत अतिक्रमण करून इमारती उभा करतात. परंतु याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी जनता दरबारात केला. पहिल्याच जनत दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून प्रशासनावर रोष व्यक्त केला. यावन अधिकाऱ्यांनी पाहतो, बघतो असेच उत्तन महापौर यांना दिले. अनेकदा महापौरांनी तुम्हाला प्रत्येक वेळेस उत्तर द्या, असे सांगाव् लागते का असा सज्जड दम भरल्याचे पहिल मिळाले. दरवेळी आश्वासन दिले जाते पण फाईल पुढे का सरकत नाही, अर्श तीव्र नाराजीही व्यक्त केली.
जनतेचा पैसा वाया जाऊ देणार नाही
नागरिकांचे प्रश्न पंधरा दिवसात प्रश्न सुटले पाहिजेत. शाहू नगरीत आजही कचरा, पाणी, गटर असे प्रश्न आहेत, याची खंत वाटते, मी जनतेचा पैसा वाया जावू देणार नाही, प्रत्येक नागरिकाला न्याय देणार आहे. तुम्ही आत्महत्या करायची नाही, एखाद्याला आपण मारूया. एक महिन्यात तुमचे प्रश्न मार्गी लागतील.
– रुपाराणी निकम, महापौर, महापालिका, कोल्हापूर
माहिती अधिकाराखाली मिळवून उपोषण, आंदोलन, केले पण महापालिका प्रशासन निवेदन स्वीकारण्या पलीकडे काहीच करीत नाही. अनेकांनी तर अधिकारी, कर्मचारी कार्यालयात नसतात असे सांगितले.एकाने तर बिल्डर लोकांना अधिकारी सामील असल्याचा आरोप केला. एका महिलेने व्यावसायिक परवाना असूनही गाडी उचलून नेल्याचा आरोप केला.
यासंदर्भात महापौर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मोठ्या उद्योजकांनी केलेल्या अतिक्रमण का काढली नाहीत, असा जाब विचारला.
संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांला गाडी परत करण्याच्या सूचना दिल्या. न्यायालयीन प्रश्न वगळता वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची स्वतंत्र नोंद करून बैठक घेत त्यावर एक महिन्यात तोडगा काढण्याचे निर्देश दिले.