
बदली आणि सुनावणीत खोडा
दिनांक 7एप्रिलपासून सुनावणीचे कामकाज सुरळीत सुरू असतानाच 16 एप्रिल रोजी सहाय्यक निबंधकांची अचानक बदली करण्यात आली. या बदलीनंतर दोन दिवस कामकाज जाणीवपूर्वक लांबवण्यात आले. राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यातील अनेक संस्थांना अद्याप नोटिसाही बजावण्यात आलेल्या नाहीत. संस्थांना सुनावणीपासून अलिप्त ठेवून त्यांना थेट अवसायनात काढण्यासाठीच हा प्रशासकीय खेळ सुरू असल्याचा संशय दूध संस्था प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
पारदर्शकतेचे आव्हान
यांना या संस्थांच्या वैधतेबद्दल शंका आहे, त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन कागदपत्रांची पडताळणी करावी आणि पत्रकारांसमोर आपले म्हणणे मांडावे, असे खुले आव्हानही यावेळी देण्यात आले. उच्च न्यायालयाचे कोणतेही निर्देश नसताना केवळ राजकीय दबावापोटी सुनावणी लांबवून ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया थांबवली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.विकास पाटील कुरुकली, युवराज पाटील बामणी, राजेखान जमादार मुरगुड, दत्तात्रय पाटील केनवडे, राजू जाधव, शेखर देसाई, संजय कलिकते, निवास पाटील, के. बी. पाटील, बाबासो रणसिंग, विश्वास पाटील यांच्यासह राधानगरी, शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
‘गोकुळ’च्या संकलनात संस्थांचा मोठा वाटा
या 1200 संस्था दररोज किमान 2 लाख लिटर दूध गोकुळ संघाला पुरवतात. संघाच्या 20 लाख लिटर संकलनाच्या टप्प्यात या संस्थांचा कणा मोलाचा आहे. केवळ राजकीय हेतूने या संस्थांना अडचणीत आणल्यास त्याचा फटका संपूर्ण जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला बसणार असल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले.