महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीनबानो, तर उपमहापौरपदी शान-ए-हिंद विजयी (Photo Credit- X)
उपमहापौर पदासाठी आठ नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. माघारीच्या मुदतीत एमआयएमचे नगरसेवक हाफिज अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे मुस्तकीम डिग्निटी, शिवसेनेचे नरेंद्र सोनवणे यांनी माघार घेतली. उपमहापौरपदासाठी शान-ए-हिंद व सेनेचे निलेश काकडे यांच्यात सरळ सामना झाला. प्रारंभी शिवसेनेचे उमेदवार काकडे यांच्यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले त्यांना १८ मते मिळाली तर समाजवादी पार्टीच्या नगरसेविका शान-ए-हिंद यांना ४३ मते मते मिळाली. या निवडणुकीतही एमआयएम २१ व भाजपच्या २ अशा २३ नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली होती.
धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान; भूम–परांड्यात सर्वाधिक तर लोहाऱ्यात झाले सर्वात कमी मतदान
मनपा सभागृहात ८४ नगरसेवक उपस्थित होते. यावेळी महापौरपदासाठी दाखल असलेल्या पाच नाम निर्देशन पत्रांची जिल्हाधिकारी प्रसाद यानी छाननी केली. या प्रक्रियेत पाचही अर्ज वैध ठरविण्यात आले. यानंतर ११.१० ते ११.२५ पर्यंत म्हणजेच पंधरा मिनिटे माधारीची दिली. या वेळेत इस्लाम पार्टीच्या ताहेरा शेख यानी माघार घेतली, परिणामी महापौर पदासाठी इस्लाम पार्टी व शिवसेनेत सरळ लढत झाली. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. प्रारंभी शिवसेनेच्या उमेदवार लता घोडके यांच्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यांना केवळ १८ मते पडली तर नसरीन बानू खालीद शेख यांना ४३ मते मिळाली. त्यांचा २५ मतांनी विजयी झाला. महापौर पदाच्या निवडणुकीत एमआयएमचे २१ व भाजपचे २ अशा २३ नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. तर कॉंग्रेसच्या तिघा नगरसेवकांनी इस्लाम व समाजवादी पार्टीला पाठिबा दिला होता. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मनपाच्या महापौरपदी नसरीन शेख यांची निवड झाल्याचे सभागृहात घोषित केले.
मनपा मालेगावच्या महापौर नसरीनबानो शेख म्हणाल्या, नागरिकांना तपास यंत्रणा व एसआयटीच्या माध्यमातून त्रास दिला गेला आहे. बनावट जन्म दाखलेप्रकरणी अनेकांना गोवण्यात आले. आता मनपाकडून कायदेशीर प्रक्रिया पार पाडू. शहर विकासासाठी कायम प्रयत्नशील राहू. शहरातील स्वछता, नागरी सुविधा सोडविल्या जातील, विशेष करून आरोग्य सुविधांवर भर दिला जाईल शहर अतिक्रमण मुक्त करू, इस्लाम व समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवक व मतदारांची आभारी आहे.
तसेच उपमहापौर शान ए हिंद म्हणाल्या, इतिहासात दोन अल्पसंख्यांक महिला महापौर उपमहापौरपदी विराजमान झाल्या आहेत. हा संविधानाचा विजय आहे. विकासासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील राहू, पूर्व व पश्चिम असा भेदभाव केला जाणार नाही. सगळ्यांना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करू.






