जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान झाले (फोटो - टीम नवराष्ट्र)
धाराशिव : राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल (दि.07) मतदान पार पडले असून उद्या (दि.09) निकाल हाती येणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा उत्साह निर्माण झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी (Election Result) समाधानकारक प्रतिसाद देत एकूण ६५.२२ टक्के मतदान केले. जिल्ह्यातील एकूण ११ लाख ४५ हजार ८८८ मतदारांपैकी अंदाजे ७ लाख ४७ हजार ३७० मतदारांनी आपला लोकशाही हक्क बजावला. (Political News)
सकाळी मतदानाचा संथ प्रारंभ, दुपारनंतर वाढला वेग
मतदानाच्या पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी ७.३० ते ९.३० या कालावधीत केवळ ७.४७ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ही टक्केवारी वाढून २१.८९ टक्के झाली. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३६.६० टक्के, तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५०.०७ टक्के मतदान नोंदवण्यात आले. दुपारनंतर आणि सायंकाळच्या सत्रात मतदानाचा वेग लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.
हे देखील वाचा : ११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः ‘प्रथम अर्ज’ करणाऱ्याला ‘प्रथम प्राधान्य’
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी
प्रशासनाची चोख तयारी
निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन, निवडणूक अधिकारी व पोलीस यंत्रणा सज्ज होती. मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यात कुठेही मोठी अनुचित घटना घडल्याची नोंद नाही.
हे देखील वाचा : उत्सुकता शिगेला! दौंड तालुक्याचे मोजणीकडे लक्ष; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
राजकीय गणितांवर परिणाम
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नोंदवलेला उच्च मतदानाचा टक्का अंतिम निकालावर निर्णायक ठरण्याची शक्यता असून, भूम, परांडा व वाशी तालुक्यांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. एकूणच, धाराशिव जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, समाधानकारक मतदान टक्केवारीमुळे प्रशासनासह राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.






