बिहार निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचा मास्टरप्लान; या मतदारांवर असणार विशेष लक्ष, भाजपचं टेन्शन वाढणार?
मुंबई : काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार असून या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, BKC मधील सभेला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.
या सभेत काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर केल्या जाणार आहेत. काँग्रेस पक्ष या गॅरंटी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचवणार असून महायुतीच्या भ्रष्ट कराभाराबाबत जनजागृती करणार आहे. एकनाथ शिंदे-भाजपा-अजित पवार युती सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे तो मविआ परत आणेल. तसेच भाजपाच्या फेक नेरेटिव्हलाही चोख उत्तर दिले जाईल. काँग्रेसने कर्नाटक विधानसभेपासून गॅरंटी जाहीर केल्या असून ज्या जाहीर केल्या त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरु आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने कोणत्या गॅरंटी जाहीर केल्या व त्याची अंमलबजावणी कशी सुरु आहे हे वर्तमानपत्रात जाहिरात देऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपाच्या फेक नॅरेटिव्हला राज्यातील जनता बळी पडणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.
हे सुद्धा वाचा : सोलापूर शहर मध्यमध्ये प्रणिती शिंदेंची प्रतिष्ठा पणाला; काँग्रेसचा बाल्लेकिल्ला शाबूत ठेवण्याचे तगडे आव्हान
प्राणिती शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघ अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. खासदार प्रणिती शिंदे यांनी सलग तीन वेळा या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. अटीतटीच्या लढतीत प्रणिती शिंदे यांनी विधान सभेत हॅट्रीक करित विजयाची मोहर उमटवली होती. शहर मध्य मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यंदा या बालेकिल्ल्या समोर तगडे आव्हान उभे करण्यात आले आहे. भाजपचे देवेंद्र कोठे, माकपचे नरसय्या आडम, एमआयएमचे फारूख शाब्दी, बंडखोर अपक्ष उमेदवार तौफीक शेख या सर्वांची लढत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या विरोधात होणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी प्राणिती शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.