Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jitendra Avhad: “संजय राऊत मोठे कार्यकर्ते, आम्ही…”; नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

: राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत, भारत - पकिस्तान सबंध, विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांच्यावरील ट्रोलिंग, युद्धबंदी, शेतकऱ्यांचे नुकसान या विषयांवर भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2025 | 06:55 PM
Jitendra Avhad: "संजय राऊत मोठे कार्यकर्ते, आम्ही..."; नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

Jitendra Avhad: "संजय राऊत मोठे कार्यकर्ते, आम्ही..."; नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत, भारत – पकिस्तान सबंध, विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांच्यावरील ट्रोलिंग, युद्धबंदी, शेतकऱ्यांचे नुकसान यांसह अनेक विषयांवर भाष्य केले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. यावर देशाच्या नागरिकांना चर्चेच्या माध्यमातून वास्तव कळायला पाहिजे, असे आव्हाड म्हणाले.

पुढे बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांना ट्रोल केले जात आहे. मात्र सर्वसामाने नागरिक त्यांच्यासोबत उभे आहेत. ट्रोलर्स विक्रम मिस्त्रीच नाही तर त्यांच्या मुलीपर्यंत गेलेत. हा विचित्र आणि विकृत प्रकार आहे. भारताची भूमिका योग्यरित्या मांडण्याच काम विक्रम मिस्त्री यांनी केलं आहे. ”

जितेंद्र आव्हाड यांचा अंतदारसंघ असलेल्या मुंब्रामध्ये अनेक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र हा फटका मला असून भाजपला असणार आहे. नगरसेवकांना किती पैसे दिले याबाबत चर्चा खूप आहे. पण यावर मी काही बोलणार नाही.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर देखील भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “संजय राऊत मोठे कार्यकर्ते आहेत.  आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत. शरद पवार यांचे राजकारण हे संस्थात्मक प्रकारचे आहे. गोपीनाथ मुंडे असताना सकाळी शरद पवार टीका करायचे . पण संध्याकाळी ऊसतोड कामगारांसाठी हेच नेते एकत्र बसून चर्चा करायचे आणि त्यावर उपाय देखील काढायचे. शरद पवार संस्था जिवंत ठेवण्यासाठी आपले राजकीय मतभेद नेहमी बाजूला ठेवतात.”

भारत-पाकिस्तान संबंधांवर बच्चू कडूंचे मोठे विधान

प्रहार पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, ” पाकिस्तान नेहमीचे दुखणे आहे ते बंद केले पाहिजे. एकसारखे पाकिस्तान आपल्या कुरापती काढत असतो. जसे इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा केला, तसाच आपण पाकिस्तान भारतात घ्यावा. त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील, तर प्रहारचा कार्यकर्ता आणि बच्चू कडू तयार आहेच. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन्ही गट एकत्रित येण्यावरून बोलताना बच्चू कडू म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्रित आल्या तरी जनतेचे काय भले होणार आहे. राष्ट्रवादी कधी वेगळी होती? पवार साहेब आणि अजित दादा हे वेगळे होते हे शक्य आहे का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच होत्या.”

Bacchu Kadu: “सैनिक कमी पडत असतील, तर…”; भारत-पाकिस्तान संबंधांवर बच्चू कडूंचे मोठे विधान

लाडकी बहीण योजना

महायुती सरकारच्या महत्वाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बच्चू कडू बोलले आहेत. निवडणुकीत लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार आहे असे सांगितले मात्र अजून हे १,५०० वरच  अडकले आहेत. सरकारला लाडका शब्द हा कडवट होत आहे. लाडक्या बहिणीवर आणि लाडक्या शेतकऱ्यांवर ही राज्य सरकारचे लक्ष नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बारामतीतून आंदोलन करणार आहोत.”

 

Web Title: Mla jitendra avhad statement on mp sanjay raut maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • india pakistan war
  • jitendra avhad
  • sanjay raut
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
1

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

Maharashtra Politics : बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटही उतरणार? खासदार राऊतांच्या ‘या’ वक्तव्याने चर्चांना उधाण
2

Maharashtra Politics : बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटही उतरणार? खासदार राऊतांच्या ‘या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग
3

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग

Maharashtra Politics : “हमाम में सब नंगे” प्रमाणे सगळेच उघडे पडले…; अशोक खरात प्रकरणावर खासदार राऊतांची टीका
4

Maharashtra Politics : “हमाम में सब नंगे” प्रमाणे सगळेच उघडे पडले…; अशोक खरात प्रकरणावर खासदार राऊतांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.