
चिकन बिर्याणीनंतर कलिंगड खाणे ठरले घातक! मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम अहवालातून उलगडणार रहस्य
मुंबईच्या पायधुनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे अन्न विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन निष्पाप मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया (३५) आणि मुली आयेशा (१६) व झैनब (१३) अशी पटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्यांनी रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ले होते आणि त्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात, कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, त्यांनी एकत्र बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. हे कलिंगड त्यांच्या नातेवाईकांनी आणले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांनी आधी चिकन पुलाव खाऊन ते परत गेले. यानंतर, कुटुंबातील सदस्यांनी कलिंगड खाल्ले. थोड्याच वेळात सर्वांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली, त्यानंतर त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे रविवारी रात्री त्या सर्वांचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, विशेषतः टरबूज खाल्ल्यानंतर. ज्यांनी फक्त चिकन पुलाव खाल्ला होता, त्यांना कोणताही त्रास झाला नाही, असेही वृत्त आहे. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, ऊतकविकृतीशास्त्र अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
आज सोमवारी सकाळी मुंबई शहरात एक भीषण अपघात घडला. . या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मरीनड्राईव्ह परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका वृद्ध व्यक्तीला दोन बाईकस्वारांनी धडक दिली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती, एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला? याचा संपूर्ण तपशील समोर आलेला नाही.
Mumbai Accident: भीषण अपघात! मरीन ड्राईव्हवर दुचाकीने उडवले पादचारी; दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू