Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी नव्या पद्धतीची गरज; अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी केले स्पष्ट

पावसामुळे तयार होणारे खड्डे बुजवले तरी पाऊस आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेउन खड्डे बुजवण्यासाठी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प). पी. वेलरासू यांनी दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 17, 2022 | 08:07 PM
रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी नव्या पद्धतीची गरज; अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी केले स्पष्ट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पाउस आणि मुंबईतील खड्डे हे एक समीकरणच होऊन गेले आहे. केवळ कोल्ड मिस्कचा वापर होत राहिला तर हे खड्डे कायमचे बुजतील असे अतिरिक्त आयुक्तांना देखील वाटत नाही. त्यामुळे पावसामुळे तयार होणारे खड्डे बुजवले तरी पाऊस आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेउन खड्डे बुजवण्यासाठी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प). पी. वेलरासू यांनी दिले आहेत.

मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रामुख्याने डांबरी रस्त्यांवर खड्डे तयार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे खड्डे तात्काळ बुजवण्याची कार्यवाही केली जात असली तरी, सततचा जोरदार पाऊस आणि वाहतुकीचा ताण यामुळे पुन्हा खड्डे होतात. या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीचा आढावा घेतल्यानंतर वेलरासू यांनी रविवारी दिवसभर पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणी भेटी देवून खड्डे बुजविण्याच्या कामांची पाहणी केली.

पावसाळ्यात रस्त्यांवर उद्भवणारे खड्डे भरण्यासाठी प्रामुख्याने विभाग कार्यालयांच्या स्तरावर कार्यवाही केली जात आहे. कोल्ड मिक्स सारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरण्यात आले तरी जोरदार पाऊस आणि वाहतुकीच्या ताणामुळे खड्ड्यांचा टिकाव लागत नाही आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात. नागरिकांची व वाहन चालकांची गैरसोय होऊ नये आणि खड्ड्यांच्या समस्येपासून मुक्तता मिळावी म्हणून लवकरात लवकर नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचणी करणे आवश्यक आहे, असे वेलरासू यांनी नमूद केले.

हायड्रोलिक प्रेस पद्धतीने तयार केलेले पेव्हर ब्लॉक्स हे तातडीने खड्ड्यात भरता येतात. जेणेकरुन वाहनांची वाहतूक लगेच सुरू करता येते. तसेच एम ६० ग्रेड मध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये मोठ्या आकाराच्या लादी बनवून (प्रीकास्ट काँक्रिट प्लेट्स) वापरणे शक्य आहे किंवा कसे हे तपासावे. यामुळे खड्डे लवकर भरून वाहतूक लवकर सुरू होवू शकते. ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे एम ६० काँक्रिट वापरून खड्डा भरता येऊ शकेल व खड्डे भरणी मजबूत होईपर्यंत त्यावर पोलादी फळी (स्टील प्लेट) टाकावी जेणेकरून वाहतूक सुरळीत राहू शकेल याची देखील चाचपणी करण्यात यावी. अशा प्रकारची खड्डे भरणी किमान ३ ते ४ महिने टिकू शकते, त्यादृष्टीने देखील चाचपणी करावी, असेही वेलरासू सांगितले. फ्लाय ऍश अर्थात राखेपासून बनविलेल्या ब्लॉकचा देखील यामध्ये उपयोग करता येईल किंवा कसे, याचाही सांगोपांग विचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

[read_also content=”शिवसेनेच्या सामाजिक कार्याने सामान्यांच्या विकासाला चालना : डॉ. नीलम गोऱ्हे https://www.navarashtra.com/maharashtra/promoting-the-development-of-the-common-people-with-the-social-work-of-shiv-sena-dr-neelam-gorhe-305233.html”]

दौऱ्याच्या प्रारंभी महालक्ष्मी परिसरातील केशवराव खाड्ये मार्गावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाची,आर उत्तर विभागात दहिसर (पूर्व) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर रामकुंवर ठाकूर जंक्शन; आर मध्य विभागात बोरिवली (पश्चिम) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर आर. एम. भट्टड जंक्शन; आर दक्षिण विभागात स्वामी विवेकानंद मार्ग – महात्मा गांधी मार्ग जंक्शन, लिंक रोड – महात्मा गांधी मार्ग जंक्शन, कांदिवली (पश्चिम) मधील लालजीपाडा जंक्शन; पी उत्तर विभागात मालाड (पश्चिम) मधील जुना लिंक रोड – मार्वे रोड जंक्शन आणि एस. व्ही. रोड – मार्वे रोड जंक्शन; पी दक्षिण विभागात गोरेगाव (पश्चिम) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर बंडू गोरे चौक; के पश्चिम विभागात जोगेश्वरी (पश्चिम) मधील कॅप्टन सावंत मार्ग – स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन तसेच अंधेरी (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गावर अंबोली जंक्शन; एच पश्चिम विभागात सांताक्रूझ (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गावर जुहूतारा रोड जंक्शन या सर्व ठिकाणी पाहणी करून ज्या-ज्या ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) द्वारे मेट्रो रेल्वे कामांसाठी रस्ते सुपूर्द केले आहेत, त्या ठिकाणी देखील खड्डे भरण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएकडे पाठपुरावा करावा, शक्य त्या सर्व ठिकाणी विभाग कार्यालयांच्या स्तरावर खड्डे बुजविण्याची कार्यवाही दिलेल्या मुदतीत करावी असे निर्देश वेलरासू यांनी दिले.

Web Title: Need for a new method of filling potholes on roads additional municipal commissioner clarified nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2022 | 08:07 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • cmomaharashtra
  • devendra fadamvis
  • mumbai mahapalika
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: निर्यात माल अडकू नये म्हणून JNPA ची विशेष टीम; बंदरातील स्थितीत सुधारणा, कंटेनरची संख्या 5000 वरून 3200
1

Raigad News: निर्यात माल अडकू नये म्हणून JNPA ची विशेष टीम; बंदरातील स्थितीत सुधारणा, कंटेनरची संख्या 5000 वरून 3200

भारत बनला ‘अब्जाधीशांचा कारखाना’! दर आठवड्याला एक नवा अब्जाधीश, Hurun रिपोर्टचा दावा
2

भारत बनला ‘अब्जाधीशांचा कारखाना’! दर आठवड्याला एक नवा अब्जाधीश, Hurun रिपोर्टचा दावा

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद
3

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी
4

Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.