‘श्रीमंत’ Dagdusheth बाप्पा ‘प्रेम मंदिरात’ विराजमान होणार; १०० फूट उंच अन्…, काय असणार खास?
बुधवार पेठेतील प्रसिद्ध पासोड्या विठ्ठल मंदिर परिसर तसेच मंदिरावरील प्राचीन शिल्पकला आणि मूर्तींना आकर्षक रंगसंगती देऊन सजविण्यात येत आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक आध्यात्मिक आणि मनोहारी अनुभव मिळणार आहे.
याच पार्श्वभूमीवर चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून देहू-आळंदी पंचक्रोशी क्षेत्राला अधिकृतपणे ‘संतभूमी’चा दर्जा देण्याची मागणी केली आहे. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेची केंद्रे असलेल्या श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन हा दर्जा देण्यात यावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
आमदार जगताप यांनी सांगितले की, आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असून देहू हे संत तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने आणि वैकुंठगमनाने पावन झालेले क्षेत्र आहे. या दोन तीर्थक्षेत्रांदरम्यानचा सुमारे १६ किलोमीटरचा परिसर शतकानुशतके वारकरी परंपरा, हरिनाम संकीर्तन, अध्यात्म आणि संत साहित्याच्या समृद्ध वारशाचे केंद्र राहिला आहे. दरवर्षी लाखो वारकरी या मार्गावरून विठ्ठलभक्तीत तल्लीन होत पंढरपूरकडे प्रस्थान करतात.
उत्तराखंडला जसा ‘देवभूमी’चा मान प्राप्त आहे, त्याच धर्तीवर देहू-आळंदी परिसराला ‘संतभूमी’चा अधिकृत दर्जा मिळावा, अशी वारकरी समाज आणि स्थानिक नागरिकांची भावना असल्याचेही त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा गौरव वाढेल, तसेच या आध्यात्मिक वारशाचे संवर्धन, संरक्षण आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे विद्यापीठातही FDA चा दणका; कॅन्टीनचा अन्न परवानाच निलंबित, अन्नसुरक्षेतील आढळल्या गंभीर त्रुटी






