
काही दिवस आधी मुंबई-पुणे महामार्गावर 32 तास वाहतूक कोंडी
प्रवाशांचे झाले होते मोठ्या प्रमाणात हाल
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नव्या पर्यायी मार्गाचा प्रस्ताव
पुणे: मुंबई-पुणे महामार्गावर काही दिवस आधी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास 32 तासांपेक्षा जास्त कालावधी वाहतूक कोंडी झालेली. गॅस टॅंकर उलटल्याने वाहतूक कोंडी झाली. प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यानंतर सरकारवर, तेथील प्रशासनावर देखील टीका झाली. यानंतर आता नवीन मार्गाचा प्रस्ताव समोर येत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नव्या पर्यायी मार्गाचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मार्गावरील वाढत्या गर्दीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.त्यानंतर अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या उरण-कर्जत-शिरूर महामार्गाच्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या महिन्यात एक्सप्रेसवेवर सुमारे ३२ तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघात, वाहन बिघाड आणि दुरुस्ती कामांमुळे हजारो प्रवासी तासन् तास अडकून पडले.सुट्टीच्या दिवशी किंवा वीकेंडला येथे कोंडी होणे आता नेहमीचे झाले आहे.त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान एकाच मार्गावर अवलंबून राहणे धोक्याचे ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर सुमारे १३५ किलोमीटर लांबीचा शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण असा चारपदरी मल्टिनोडल कॉरिडॉर प्रस्तावित आहे. हा मार्ग सुरू झाल्यास पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. औद्योगिक भागांतील मालवाहतूक थेट उरण बंदराशी जोडली गेल्यास मोठी सोय होईल.मात्र हा प्रकल्प अद्याप मंजुरी आणि अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर या पर्यायी मार्गाबाबत प्रशासन लवकर निर्णय घेणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया
टॉमटॉम इंडेक्सनुसार, बेंगळुरू या यादीत अव्वल स्थान पटकावला आहे. या शहरातील सरासरी वाहनांचा वेग फक्त 16.6 किमी/तास नोंदवला गेला. येथील रहिवासी 15 मिनिटांत सरासरी 4.2 किमी प्रवास करतात. शिवाय, लोक वर्षाला 168 तास वाहतूक कोंडीत वाया घालवतात.
दुसऱ्या क्रमांकावर पुणे आहे, जिथे सरासरी 18 किमी/ताशी वेग आहे आणि सरासरी 4.5 किमी अंतर 15 मिनिटांत पार केले जाते. येथील लोक वाहतुकीमुळे वर्षाला 152 तास वाया घालवतात.
स्वप्नगरी मुंबई शहरात वाहनांचा सरासरी वेग 20.8 किमी/तास आहे आणि 15 मिनिटांत कापलेले सरासरी अंतर 5.2 किमी आहे. मुंबईतील लोक दरवर्षी त्यांच्या वर्षातील 126 तास वाहतूकीत वाया घालवतात.