
Raigad News: महाड MIDC मध्ये विषारी वायूगळती; दोन कामगारांचा मृत्यू, कंपनीविरोधात ग्रामस्थांचा संताप
स्थानिक आमदार तथा कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या अनुपस्थितीत विकास गोगावले यांनी तत्काळ पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदतकार्याची माहिती घेतली. संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी वातावरण शांत केले. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी तातडीने बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या कंपन्यांवर कठोर निर्बंध लादण्याचा इशाराही त्यांनी दिला. (फोटो सौजन्य – AI Created)
या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विकास गोगावले यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पोलीस प्रशासनाशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. मृत कामगारांच्या कुटुंबीयांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेत, त्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी यासाठी बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या, त्याचाप्रमाणे अशा प्रकारच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या कंपन्यांवर कठोर निबंध घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला एचसीएल वायूची गळती झाल्याची माहिती दिली. मात्र हा वायू एचसीएल नसल्याचा दावा ग्रामस्थांनी असून कंपनीकडून दिशाभूल केली जात असल्याचे बोलले जात आहे. अशा चुकीच्या प्राथमिक माहितीमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांना विलंब झाला का? याची चौकशीची मागणी होत असून जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोपही केला. महाडचे माजी उपसभापती चंद्रकांत बुवा जाधव आणि पंचायत समिती सदस्य मयूर जाधव यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. कंपनीत यापूर्वीही दुर्घटना झाल्याचा दावा करत कंपनी बंद करण्याची मागणी करण्यात आली.
वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला ‘अलर्ट’; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश
ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कंपनी प्रशासनाने मृत कामगारांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारून योग्य भरपाईची हमी देईपर्यंत मृतदेह कंपनीच्या आवारातून ताब्यात घेणार नसल्याची भूमिका स्थानिक नेते सुभाष निकम यांनी घेतली. भविष्यात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या अशा धोकादायक कंपन्या परिसरात चालू ठेवू नयेत, असा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला.