Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात! अवकाळी पावसाने शेती, बागा उद्ध्वस्त; भाताचे रोप तर…

सप्टेंबर २०२५ मध्ये तालुक्यातील ४५ गावांतील २४५ शेतकऱ्यांचे जवळपास ४.८८ लाख रुपयांचे नुकसान नोंदवले गेले होते. तरीही, शासनाकडून कोकणाला केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2025 | 03:07 PM
कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात! अवकाळी पावसाने शेती, बागा उद्ध्वस्त; भाताचे रोप तर...

कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात! अवकाळी पावसाने शेती, बागा उद्ध्वस्त; भाताचे रोप तर...

Follow Us
Close
Follow Us:

शासनाला अहवाल पाठवणार: कृषी अधिकारी रवींद्र माळी
कोकणातल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज
दष्काळ घोषित करून तातडीची मदत देण्याची मागणी

खेड: तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार अवकाळी पावसामुळे हवालदिल झाले आहेत. नुकतीच कापणीला आलेली भातशेती पावसाने पूर्णपणे उद्धवस्त केली असून, हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. गेल्या आठवडाभरात पडणाऱ्या सरींमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, काही ठिकाणी भाताचे रोप पूर्णपणे चिखलात तुटून गेले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, १ नोव्हेंबरच्या पावसात शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून, येत्या काही दिवसांत अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी दिली. कोकणातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने वर्षभर पुरेल इतका तांदूळ मिळवण्यासाठी भातशेती करतात. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने ९० टक्क्यांपर्यंत नुकसान केले आहे.

केवळ आश्वासनांवरच मानावे लागले समाधान

यापूर्वीही सप्टेंबर २०२५ मध्ये तालुक्यातील ४५ गावांतील २४५ शेतकऱ्यांचे जवळपास ४.८८ लाख रुपयांचे नुकसान नोंदवले गेले होते. तरीही, शासनाकडून कोकणाला केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले. यावेळी तरी शासन आणि लोकप्रतिनिधींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

दुष्काळ घोषित करून तातडीची मदत देण्याची मागणी

आता भातानंतर घेण्यात येणारी पावटा, तूर, कडवा आदी पिकांची पेरणीही हवामान अनुकूल नसल्याने धोक्यात आली आहे. आष्टी येथील शेतकरी वहाब सेन यांनी सांगितले की, ‘गेल्या पंधरा दिवसांच्या पावसामुळे कापलेली भातशेती चिखलात सडली आहे. या संकटातून सावरणे शेतकऱ्यांसाठी कठीण असून, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी.’ दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांनी कोकणातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्यांवर वेळ न घालवता थेट ओला दुष्काळ घोषित करून सर्व शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

अवकाळीने हिरावला हातचा घास! ‘या’ तालुक्यात 508 शेतकऱ्यांचे…; काही दिवस पाऊस झोडपण्याची शक्यता

अवकाळीने हिरावला हातचा घास

खेड तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०८ शेतकऱ्यांचे सुमारे ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. तालुक्यात मे ते सप्टेंबर या पाच महिन्याच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात एकूण ४७.७५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. मात्र सप्टेंबर अखेर पासून सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपिक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवड्‌याभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली. तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत.

Web Title: Konkan farmers crop damage in unseasonal rain weather maharashtra government news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Crop damage
  • Farmers
  • Kokan News

संबंधित बातम्या

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध
1

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क
2

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क

बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये आजार वाढले, दूध उत्पादनात घट; शेतकऱ्यांवर उपचार खर्चाचा भार
3

बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये आजार वाढले, दूध उत्पादनात घट; शेतकऱ्यांवर उपचार खर्चाचा भार

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला
4

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.