आंबा बागायतदाराच्या चिंतेत वाढ (फोटो- istockphoto)
आंबा बागायतदारांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी
शेतकरी बागायतदार संघाचे पालकमंत्र्यांना साकडे
फळधारणा संपष्टात येण्याची भीती
देवगड: देवगड तालुक्यात आंबा पिकावर आलेल्या गंभीर अरिष्टाच्या पार्श्वभूमीवर आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड यांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन सध्याची भीषण परिस्थिती मांडली. यावेळी आंबा उत्पादनावर झालेल्या परिणामाची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना तातडीच्या दिलासादायक उपाययोजनांची मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष विलास रूमडे यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदारांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याने यंदा भरघोस उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र मोहोरासोबत पालवीही मोठ्या प्रमाणात आल्याने तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढला.
गेल्या दहा वर्षांतील ही सर्वात गंभीर परिस्थिती
फवारण्या, मजुरी, कीटकनाशके व इतर निविष्ठावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढून तो शेतक-यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मागील दहा वर्षांतील ही सर्वांत गंभीर परिस्थिती असल्याचे सांगत या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने वेळीच आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी कळकळीची मागणी शेतकरी संघाच्या वतीने अध्यक्ष विलास रूमडे यांनी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
कोकणात बागायतदारांचे वणव्याने मोठे नुकसान; ४० कलमे होरपळली, लाखांचे नुकसान
फूलकिडीचा तीव्र प्रादुर्भाव; फळधारणा संपष्टात येण्याची भीती
त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी-बागायतदारांनी मोठ्या खचर्चाने फवारण्या केल्या. दरम्यान, अचानक वाढलेल्या थंडीमुळे कमाल व किमान तापमानातील फरक अंशांपेक्षा अधिक राहिला. तापमानात घट झाल्यामुळे संयुक्त फुलांचे प्रमाण कमी इतले, तर नरफुले अधिक राहिली. परिणामी फळधारणा जवळजवळ न झाल्यासारखी असून जी थोडीफार झाली आहे, तीही झाडांच्या टोकावर असल्याने ती बेभरवशाची असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यातच गळून गेलेल्या मोहोरावर पुनमर्मोहोर येत असताना त्यावर थ्रीप्स (फुलकीड) किडीचा तीव्र प्रादुर्भाव झाला आहे. या किडीवर अद्याप कोणताही ठोस उपाय उपलब्ध नसल्याने उरलेली थोडीफार आशाही संपुष्टात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






