
निदा खान प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील! त्यांना तात्काळ अटक करा- पालकमंत्री संजय शिरसाट
यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणी निदा खान मुद्यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याने इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच निदा खानला आश्रय दिला होता. हे आता स्पष्टही झाले आहे. आता पोलिसांनी जलील यांना नोटीस द्यावी, त्यांना बोलवून घ्यावे, त्यांचे स्टेटमेंट घ्यावे आणि अटक करावी. जोपर्यंत जलील यांना अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणामागेही सूत्रधार कोणाचे हे समोर येणार नाही. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या घडामोडींनुसार जलील हेच याचे सूत्रधार असल्याचे दिसत आहे.जलील यांच्याकडे निदा खानला कोणी पाठवले हाही मोठा प्रश्न आहे. या सर्व बाबींचा उलगडा व्हायचा असेल तर आधी जलील यांना अटक करणे गरजेचे असल्याचे शिरसाट म्हणाले.
शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल
इंधन दरवाढीबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, आखाती देशातील युद्धाचा परिणाम केवळ भारतावरच नव्हे तर जगभरातील देशांवर झालेला आहे. युद्धामुळे पेट्रोल, डिझले, गॅससोबतच इतर वस्तूंचे दरही वाढले आहेत. बराचसा माल वाहतुकीवर अवलंबून असल्याने ही दरवाढ दिसतेय. युद्ध बंद झाले तरच या किमती कमी होतील. युद्ध आणखी चिघळल्यास किमतीही वाढतील ही शंका प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. युद्ध थांबवणे हाच यामागील पर्याय आहे दरवाढीला थांबवणं अवघड असल्याची भीती पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
नीट परीक्षेचा पेपर लीकमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोज जनता पार्टीने केली आहे. यावर पालकमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या घटनेला चुकीचे म्हटले आहे. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकरणात गुंतलेले अधिकारी, कोचिंग क्लासेस आणि संबंधितांना अटक करण्याचे सत्र सुरु केले आहे. पेपर फुटण्याला कोणाचेही समर्थन नाहीच तर, फोडणाऱ्यांवर कारवाई ही सरकारची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जो खेळेल त्याला माफी दिली जाणार नाही, अशी शिवसेनेचीही भूमिका असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.