Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेतील राड्यावरुन बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया; भाजपवर केली जोरदार टीका

राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून, विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 18, 2025 | 04:46 PM
विधानसभेतील राड्यावरुन बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया; भाजपवर केली जोरदार टीका

विधानसभेतील राड्यावरुन बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया; भाजपवर केली जोरदार टीका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विधीमंडळाच्या लॉबीत गुरुवारी आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा पहायला मिळाला. या हाणामारीनंतर महाराष्ट्रातून टीकेची झोड उठली आहे. यावरुन काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा दिली जात असून, राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून, विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विधानसभेमध्ये झालेला राडा, आमदार निवासातील भांडण आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. बीडमधील निरापराध सरपंचाला ज्या पद्धतीने मारले गेले. ते मानवतेला लाज वाटणारे आहे. एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहे. एक आमदार कॅन्टीनमधील वेटरला मारहाण करत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना गुंडांनी मारहाण केली ते गुंड भाजपचे पदाधिकारी आहेत. एखाद्या समाजाला विरोध करायचा, वडीलधाऱ्यांना काहीही बोलायचे अशी भाजपने काही गुंड आणि वाचाळवीरांना मुभा दिलेली आहे. एक प्रकारे राज्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका थोरात यांनी केली आहे.

पुढे बोलतांना थोरात म्हणाले, महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते फंडे वापरले, किती पक्ष फोडले, कसे चुकीचे निकाल दिले हे सर्व जनतेला माहित आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात नियंत्रण नाही. गुंड फोफावले आहेत. दहशत निर्माण झाली आहे. आणि ही दहशत भाजप पुरस्कृत असून, राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्या पक्षाला हे लाजिरवाने आहे. मी चाळीस वर्षे विधानसभा सदस्य म्हणून काम केले अशी संस्कृती कधीही नव्हती .वादविवाद असतात परंतु त्यानंतर चहापानासाठी एकत्र यायचे. परंतु सध्या गुंड विधानसभेत येत आहेत. मारहाण करतात. त्या गुंडांना संरक्षण दिले जाते आहे. मारहाण करणाऱ्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला मात्र शिक्षा हा काय प्रकार आहे. हे जनतेने वेळीच ओळखले पाहिजे. विधानसभेमध्ये झालेला राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याचबरोबर प्रवीण गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर आणि संत परंपरांचे विचार समतेचे व बहुजनांचे विचार सांगत आहेत. हा विचार काही कडवट लोकांना सहन झाला नाही. आणि त्यातून त्यांच्यावर हल्ला झाला आहे हा काटे कोण आहे. तो गुंड आहे आणि तो पदाधिकारी आहे. त्याला पद दिले जात आहे .या काटे मागचे खरे सूत्रधार शोधले पाहिजे. असे काटे जनतेने मोडून काढले पाहिजे. अशा प्रसंगी जनतेने अधिक संवेदनशील होऊन जागृत झाले पाहिजे. सरकार विरोधात आवाज उठवला पाहिजे आम्ही तर लढणारच आहोत परंतु जनतेनेही याबाबत आवाज उठवणे गरजेचं असल्याचं थोरात म्हणाले.

हे सुद्धा वाचा : मोक्काची दहशत पोलिसांवरच! गुन्हेगारांने पोलिसांच्याच तोंडावर मारला मिरची स्प्रे

सरकारला जाब विचारला पाहिजे – थोरात

महायुती सरकार अनेक खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे अमिष दाखवले. मात्र पंधराशे वेळेवर दिले जात नाही . अनेक लाडक्या बहिणींची नावे दररोज कमी केली जात आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. शेतकरी अडचणीत आहे खरे तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र आता सरकार याबाबत बोलत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत जागरूक होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Web Title: Senior congress leader balasaheb thorat has criticized the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 04:43 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • gopichand padalkar
  • jitendra avhad

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
2

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
3

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
4

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.