
Shashikant Shinde, Javli Politics Satara
नवी मुंबई येथे जावली-महाबळेश्वर आणि माथाडी कामगारांच्या संयुक्त संवाद मिळाव्यात शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे नेते ऋषिकांत शिंदे, जावळी, महाबळेश्वर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पदाधिकारी तसेच जावळीतील अनेक जुने कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे यांनी ज्ञानदेव रांजणे, वसंतराव मानकुमरे यांचे थेट नाव न घेता त्यांच्या गलिच्छ राजकारणावर सडकून टीका केली. शशिकांत शिंदे म्हणाले वरोशी, आखाडे, आलेवाडी गावातील सोसायटीच्या ठरावाबाबत शिवेंद्रजेंना चुकीचे सांगितले गेले, चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले. माथाडीच्या आराध्य देवतांची आणि साहेबांची शपथ घेऊन सांगतो, जावळीतालुक्यातील अंतर्गत सगळी लोक आमच्याबरोबर होती. आपल्यावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला. इतका दबाव का आणला गेला हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. सत्तेचा पैशाचा आणि अधिकाराचा वापर करून दबाव आणला जात होता. मात्र निवडणुका येतात आणि जातात पण माणसांची मन बिघडवली जातात, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या राजकारणावर निशाणा साधला.
गेली सतरा वर्षांपासून जावळीची जनता आपल्या पाठीशी असल्याचे सांगत शिंदे म्हणाले जी १७ वर्षे माझ्या पाठीमागे जनता उभी आहे.त्या जनतेसाठी आता कायमस्वरूपी मी उभा राहणार आहे. जावळीचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते एकत्र येत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. जावळी तालुक्यात मनसे, शिंदे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि वेगवेगळ्या पक्षातील माणसे एकत्र आले आहेत. एवढ्यासाठीच की जावळीचा स्वाभिमान जिवंत राहिला पाहिजे. वेगवेगळ्या पक्षांची माणसे एका तालुक्यात एकत्र येतात याचा अर्थ कुठेतरी अत्याचार अन्याय किंवा दबाव होत आहे. असे देखील शिंदे यावेळी म्हणाले.