औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड, प्रसाद लाड (Koshyari, Mangalprabhat Lodha and Sanjay Gaikwad, Prasad lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून, भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा अजेंडा आखला आहे का? असं बोललं जात असून, भाजपाच्या नेत्याविरोधात शिवप्रेमी तसेच विरोधक आंदोलन करत असून, यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
[read_also content=”आळशी राजाचं राज्य अधिक काळ चालत नाहीय, बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/mla-bachu-kaduchi-criticizes-to-uddhav-thackeray-351096.html”]
दरम्यान, भाजपा नेत्यांच्या वादग्रस्त वक्यव्यावर विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावर ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी थेट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्यामुळं दानवेंना ठोकून काढले पाहिजे असा इशारा खैरेंनी दिला आहे. भाजपाच्या लोकांनी महाराजांचा अपमान करण्याची सुपारी घेतली आहे. रोज उठून कोणीही महाराजांचा अपमान करत आहे, किंवा त्यांच्याविषयी वादग्रस्त बोललं जात आहे. अश्या लोकांना ठोकून काढले पाहिजे असं माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आहे. तसेच नाराज आमदार पुन्हा येतील का, यावर बोलताना खैरे म्हणाले की, 30 तारखेनंतर शिंदे गटात विस्फोट होईल, अनेक नाराज आमदार फुटतील असं खैरेंनी म्हटले.
भाजपा नेत्यांची काय आहेत वादग्रस्त वक्तव्यं?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे जुन्या काळातील आदर्श होते. आताच्या काळातील आदर्श नितीन गडकरी आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र लिहून औरंगजेबची माफी मागितली होती, असं विधानं केलं. मंत्री मंगलप्रभात लोढा व संजय गायकवाड यांनी शिंदे गटाने केलेल्या बंडाची तुलना महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म शिवनेरीवर झाला नसून, कोकणात झाला आहे. आणि महाराजांचे बालपण रायगडावर गेले आहे असं म्हटलंय. यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून भाजपाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.