
Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक
Raigad News: पोशीर नदीवर बोरगाव येथे धरण बांधले जाणार असून याला शेतकऱ्यांनी विरोध आहे. गाव बैठकाही सुरू झाल्या आहेत. दरम्यान धरणाचे काम दिलेल्या ठेकेदाराला स्थानिकांनी पिटाळून लावले असून धरणाच्या विरोधात येथील शेतकरी आक्रमक झाला आहे. मुंबई महानगरची वाढती तहान भागवण्यासाठी राज्य सरकारने कर्जत तालुक्यातील पोशीर आणि शिलार धरण प्रकल्पांना हिरवा कंदील दिला आहे. मात्र या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर संघर्षाची ठिणगी पडली आहे. पोशीर प्रकल्पासाठी तब्बल २,११० कोटी रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली असून ‘मे. प्रसाद कन्स्ट्रक्शन’ कंपनीला रायगड पाटबंधारे विभागाकडून कार्यारंभ आदेशही दिले.
Panvel Municipal Corporation: ६ मार्चला महत्त्वाची महासभा; पनवेल महानगरपालिका विकासासाठी सज्ज
प्रशासनाने कामाला गती दिली असली तरी बाधित गावांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. एकीकडे सरकार प्रकल्प मार्गी लावण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे स्थानिकांचा वाढता विरोध पाहता पोशीर प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा संघर्ष किती तीव्र होणार? प्रशासन आणि शेतकरी यांच्यात तोडगा निघणार का? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. बोरगावजवळील पोश्री नदीवर प्रस्तावित असलेल्या या धरणामुळे सुमारे १ हजार २२१ हेक्टर सुपीक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे बोरगाव, बोंडेशेत, पेंढरी ही तीन गावे बाधित होणार असून धरणाच्या पाण्याचे क्षेत्र हे परिसरातील भोपळेवाडी, चेवणे, चई, ओलमन आणि चाफेवाडी या गावाला विळखा घालणार आहे. पिढ्यानपिढ्या कसत आलेली जमीन गमवावी लागेल, भूमिहीन व्हावे लागेल आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
Karjat News : अपघाताचं सत्र संपता संपेना; कर्जत-कल्याण राज्यमार्गावर होतोय मृत्यूचा सापळा
“आमची जमीन हीच आमची आई आहे. मुंबईची तहान भागवण्यासाठी आम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न होतोय. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची वडिलोपार्जित जमीन देणार नाही”, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. नेतृत्व आता स्थानिक युवकांनी हाती घेतले. बोरगाव येथील पुरातन शिवमंदिरात नुकतीच नियोजन बैठक झाली. शासनाच्या कोणत्याही सर्वेक्षणाला विरोध करणे, कामाला अटकाव करणे, प्रकल्पामुळे नुकसानीबाबत जनजागृती करणे, अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.