
पुण्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर; उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. बहुतांश भागात पारा 36 अंशांच्या पुढे गेला असून, मार्च महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे.
शहर आणि परिसरात मंगळवारी (दि.१०) १६.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान तर ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. आकाश मुख्यतः निरभ्र होते. मात्र, बुधवारी (दि.11) तापमानामध्ये वाढ झाली असल्याने सकाळपासूनच पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि परिसरात बुधवारी (ता.११) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान स्थिर राहण्याचा अंदाज होता. त्यामुळे तापमानात घट झाल्याचे पाहिला मिळत आहे.
हेदेखील वाचा : Pune Traffic News : पुणे होणार ट्रॅफिकमुक्त ! नितीन गडकरींकडून ४५ हजार कोटींच्या ६ महाप्रकल्पांची घोषणा
पुण्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर १६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच गुरुवारपासून (ता. १२) कमाल तापमानात पुढील दोन दिवस घट होण्याची शक्यता असून, ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?
अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे, उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असून, शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे.
अमरावती, अकोल्यात उष्णतेची लाट कायम?
विदर्भासह बिहार, झारखंड व छत्तीसगड या भागावर सध्या कमी दाबाचा द्रोणीय पट्टा सक्रिय असून पश्चिम हिमालयावर पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव दिसून येत आहे. या हवामान स्थितीमुळे विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या विदर्भातील कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असून, किमान तापमान १९ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. भारतीय हवामाना विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.