कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींनाही जाब विचारला पाहिजे, असे म्हणत त्यांनी सरकारला आणि प्रशासनाला लक्ष्य केले. “हे प्रश्न फक्त एखाद्या विशिष्ट वर्गाचे किंवा विद्यार्थ्यांचे नाहीत. या रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो,” असे त्यांनी सांगितले.मुंबईतील लोकल प्रवासातील समस्यांवरही त्यांनी भाष्य केले. “ट्रेनला दरवाजे नाहीत म्हणून दररोज लोकांचे जीव जात आहेत. ही विचित्र परिस्थिती आहे,” अशी टीका त्यांनी केली.
“मी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी आलो होतो; मात्र येताना रस्त्यांची दुरवस्था पाहिली. पत्रकार आणि आपण सर्वांनी मिळून आता सरकारला प्रश्न विचारला पाहिजे,” असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले.नाशिकमधील मनसेच्या सत्ताकाळाचा दाखला देत त्यांनी, “नाशिकमध्ये आमची सत्ता होती, तेव्हा रस्त्यावर एकही खड्डा नव्हता,” असा दावा केला.
दरम्यान, विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या समस्या फार मोठ्या नसून सहजपणे सोडवता येण्यासारख्या आहेत, असेही अमित ठाकरे यांनी सांगितले. “ज्या-ज्या विद्यार्थ्यांना भेटतोय, त्यांचे प्रश्न एकदम सोपे आहेत. हे प्रश्न सहजपणे सोडवता येऊ शकतात,” असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या बातमीवर मनसे नेते अमित ठाकरे कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत त्यांच्यासोबत मनसे नेते राजू पाटील डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील आणि इतर पदाधिकारी देखील आहेत.
डोंबिवलीतील प्रगती कॉलेज मधील विद्यार्थिनींची संवाद साधताना काही विद्यार्थिनींनी सांगितलं .या ठिकाणी गडदूल्यांच्या त्रास आहे. चेतना कॉलेज बरोबरच प्रगती कॉलेजला देखील आमच्या युनिट राहणार आहे. पोलिसांना सांगून पोलीस काही करत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार.






