
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
कल्याण पश्चिमेकडील गांधारी गावात अशोक लोखंडे आपल्या कुटुंबासोबत राहतात. तेव्हा त्यांच्या घरात काहीतरी वाळवळताना दिसलं. जवळ जाऊन पाहिलं असता चक्क विषारी नागाची तब्बल 15 ते 20 पिल्लं आढळून आली. हे बघताच लोखंडे कुटुंबीय भयभीत झाले. या नागाच्या पिल्लांचे पालकही परिसरात असावेत. या पिल्लांच्या संपर्कात गेल्यास जीवाला धोका निर्माण उद्भवू शकतो असे त्यांना वाटले. त्यांनी तातडीने सर्पमित्राला नागाच्या पिल्लांविषयी माहिती दिली.
पिल्ले जंगलात सोडली…
माहिती मिळताच कपिल कारभारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची पाहणी करून त्यांनी सर्व पिल्ले सुरक्षितपणे पकडली आणि एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये त्यांना बंद केले. सर्पमित्र कपिल कारभारी यांनी वनविभागाच्या नियमांनुसार ड्रममध्ये भरलेली ही पिल्ले शहरापासून दूर जंगलातील सुरक्षित अधिवासात नेऊन सोडली. नैसर्गिक अधिवासात पिल्ले सोडल्याने त्यांचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होईल, असे सर्पमित्र कपिल कारभारी यांनी सांगितले. गांधारी गाव हे जंगलापासून काही अंतरावर आहे. गावखेडे असल्याने या गावातील परिसरात वारंवार लहान-मोठे, बिनविषारी आणि विषारी साप आढळून येत असल्याच्या घटना घडत असतात. पावसामुळे बिळांमध्ये पाणी शिरत असल्याने साप बाहेर पडत आहेत. अशावेळी घरात, अंगणात किंवा परिसरात साप दिसला तर घाबरून जाऊ नका. तातडीने सर्पमित्रांना संपर्क करा.
सापांबद्दल जनजागृतीची गरज
सापांविषयी जनमानसांत भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. मात्र साप हा शेतकऱ्यांचा मित्र तर आहेच, शिवाय तो निसर्गाचा अविभाज्य घटकही आहे. त्यामुळे त्याचं जतन करणं आवश्यक आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला साप मानवी वस्तीत शिरकाव करण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्राला बोलावून साप पकडून जंगलात सोडण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन कपिल कारभारी यांनी केले आहे.
Ans: कल्याण पश्चिमेतील गांधारी गावातील अशोक लोखंडे यांच्या घरात नागाची पिल्लं आढळली.
Ans: घरात 15 ते 20 कोब्रा नागाची पिल्लं आढळून आली.
Ans: सर्पमित्र कपिल कारभारी यांनी पिल्लांना पकडून जंगलातील सुरक्षित अधिवासात सोडले.