Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूनंतरही थांबेना शेतकरी कुटुंबाची फरपट! २ वर्षांपासून अतिवृष्टीचा तडाखा; नापिकी, कर्जबाजारीपणा वाढला

अतिवृष्टी, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी नामदेव रंजवे यांनी आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेतही आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने जीवन संपवले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 25, 2026 | 08:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

निसर्गाची अवकृपा, सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे Risod तालुक्यातील भोकरखेड येथील अल्पभूधारक शेतकरी नामदेव शंकर रंजवे यांनी २३ जानेवारी रोजी गावालगतच्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेत लेकीच्या लग्नासाठी आर्थिक जुळवाजुळव न झाल्याने शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपवले. अशा दुर्दैवी घटनांमुळे तालुक्यातील शेतकरी संकट अधिक गडद होत चालले आहे.

Kolhapur News :स्कॅनर स्कॅन करण्याचे चार दिवस नाटक; कोल्हापुरात पुन्हा कचऱ्याचे ढीग

गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने अनेकांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. मात्र, आत्महत्येनंतरही शेतकरी कुटुंबांची यातना संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे.

शासनाने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात या मदतीचा लाभ मिळण्यात मोठा विलंब होत आहे. नामदेव रंजवे यांच्या कुटुंबाला दोन वर्षांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वारस प्रमाणपत्र, मृत्यू दाखला, इतर आवश्यक कागदपत्रे सादर करूनही मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या दिरंगाईमुळे मदत मिळालेली नाही.

‘कागद आणा, सही आणा, पुन्हा या’ अशा उत्तरांनी एका दुःखी विधवेच्या जखमांवर मीठ चोळले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा नेमकी कुणासाठी काम करते, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अशा कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Ahilyanagar News: चुकीचा रिव्हर्स अन् कार थेट पाण्यात! मदतीला गेलेला तरुणही वाहून गेल्याची भीती

दरम्यान, श्रवणबाळ योजना, निराधार योजना तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत मदत मिळेल, अशी आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही. त्यामुळे पतीच्या मृत्यूनंतरही शशिकला रंजवे यांना आर्थिक मदतीसाठी भटकंती करावी लागत आहे. अल्पभूधारक असलेल्या रंजवे कुटुंबाकडे अत्यल्प शेती असून सलग नापिकीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. बँकेचे कर्ज आणि खासगी सावकारांचा तगादा यामुळे नामदेव रंजवे मानसिकदृष्ट्या खचले आणि त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. घटनेला दोन वर्षे उलटूनही कुटुंबाला न्याय न मिळाल्याने विधवा पत्नीने तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची भेट घेतली आहे. आता तरी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: The farmers familys troubles did not stop even after death heavy rains for 2 years in risod

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News : शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्वेक्षणाला प्रारंभ; ९ लाखांहून अधिक नागरिकांची होणार तपासणी
1

Buldhana News : शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्वेक्षणाला प्रारंभ; ९ लाखांहून अधिक नागरिकांची होणार तपासणी

Buldhana News : शेगाव आणि शिर्डीत उभारले जाणार फूड स्ट्रीट हब; केंद्र सरकारकडून २ कोटींचा निधी मंजूर
2

Buldhana News : शेगाव आणि शिर्डीत उभारले जाणार फूड स्ट्रीट हब; केंद्र सरकारकडून २ कोटींचा निधी मंजूर

मानोऱ्यात हागणदारीमुक्तीचा बोजवारा! उघड्यावर जाण्याचे प्रकार; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
3

मानोऱ्यात हागणदारीमुक्तीचा बोजवारा! उघड्यावर जाण्याचे प्रकार; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Buldhana News : गोवंश संरक्षणासाठी सरकारचे कठोर पाऊल! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचे निर्देश
4

Buldhana News : गोवंश संरक्षणासाठी सरकारचे कठोर पाऊल! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.