उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर मत मांडले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात जाणार आहेत. मुंबईतील तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला ठाकरे अनुपस्थित होते, मात्र ते हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी विधानसभेत उद्धव ठाकरे कोणते मुद्दे मांडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सोमवार 16 डिसेंबर ते शनिवार 21 डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. त्यासाठी रविवारी 15 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे विशेष विमानाने नागपुरात पोहोचतील. ठाकरे पहिल्या दिवसापासून ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. 16 आणि 17 तारखेला ते या सहभागी होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे संख्याबळाच्या कमतरतेमुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणार असल्याचे संकेत आहेत, मात्र राष्ट्रपतींनी त्यास मान्यता दिल्यास विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे सहभागी होऊ शकतात.
सभापती राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेत्याबाबत सस्पेन्स कायम ठेवत महाराष्ट्र विधानसभेच्या नियमातील तरतुदी तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या चालीरीती आणि परंपरेनुसार मी योग्य तो निर्णय घेईन, असे सांगितले. सोमवारी विधानभवन येथे झालेल्या व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीनंतर 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरचे हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात रान पेटवले असतानाच मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष शिवसेनेने अरबी समुद्रात ईव्हीएमची प्रतिकृती विसर्जित करून निषेध केला. पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी हा वेगळा विरोध सुरू केला आणि ‘ईव्हीएम काढून टाकण्याची’ मागणी केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने ईव्हीएमविरोधात बिगुल वाजवला. शिवसेनेचा यूबीटी पक्ष ईव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना चित्रे यांनी निषेध केला.
Mardaani 3: ‘मर्दानी’च्या अवतारात पुन्हा परतणार राणी मुखर्जी; तिसरा भाग जाहीर
दुसरीकडे, उद्या (14 डिसेंबर) नव्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून 35 जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तसेच यंदाचा शपथविधी नागपुरात होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात कुणा-कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युलाही ठरला असून यात भाजपकडे सर्वाधिर 21 खाती असतील तर, शिंदे गटाकडे 13 आणि अजित पवार यांच्याकड 9 मंत्रिपदे असतील. पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यात भाजपचे 17, शिंदे गटाचे 10 आणि अजित पवार गटाचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील.
यंदाच्या खातेवाटपात भाजप यावेळी आपल्या धक्कातंत्राचा वापर करू शकतात, अशीही माहिती आहे. यात महत्त्वाचं म्हणजे, गृहमंत्रालय आणि अर्थखाते भाजप स्वत:कडे ठेवणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर आपल्याकडे गृहमंत्रालय मिळावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही गृहमंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यामुळे यावेळीही गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. त्याशिवाय अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखातेही यावेळी भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे.