पुढील तीन दिवस पावसाची शक्यता
राज्याच्या काही भागात उष्णता कमी होण्याचा नाव घेत नाही आहे तर काही भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावून आपला कहर केला आहे. विदर्भात काल सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. नागपूर शहरात जोरदार पावसाच्या सरीसह गारा पडल्या आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर गोंदिया, भंडारा, वर्धा जिल्ह्यात विजा व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. चंद्रपुर जिल्ह्यात दोघांचा मृत्य देखील झाला आहे. गडचिरोलीत शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत 62.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
12 विच्या विद्यार्थ्यांची धडधड वाढली; आज जाहीर होणार निकाल; ‘या’ वेबसाईटवर येणार पाहता
वर्धा जिल्ह्यातील सेल तालुक्यच्या सुरगाव परिसर रविवारी दुपारी सुमारे अर्धा तास बोरांच्या आकाराच्या गारांचा पाऊस पडला. यामुळे भाजीपाला पिकासह आणि केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकाला मोठा फटका बसला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यता कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता?
अवकाळी पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. ढंगांच्या कडकडाटासह गारा पडल्याचे विदर्भात पाहायला मिळाले. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली असून काही भागात गारपिटीची देखील शक्यता आहे. मुंबईत ६- ७ मे दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ५ ते ७ मे दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपिटीची शक्यता आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये 6 व 7 मे, मराठवाड्यात 7 मे, विदर्भात 5 मेला अवकाळी पावसासोबतच गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे. यासंबंधीची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
पाऊस आणि गारपिटीमुळे 2 जणांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात काल संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या गारपिटीमुळे २ वेगवेगळ्या घटनांमध्ये २ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. चंद्रपुर शहरातल्या आकाशवाणी परिसरात काल संध्याकाळी वादामुळे विजेची एक जिवंत तार तुटून रस्त्यावर पडली होती. रात्री या परिसरात सायकलने जाणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा या तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव प्रभाकर शिरसागर (52) असं आहे.
दुसरी दुर्घटना चिमूर तालुक्यात हिवरा येथे घडली. एका मेंढपाळाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. विकास ढोरे (45) असं मृत मेंढपाळाचे नाव आहे. शेतात मेंढ्या चराई करत असताना संध्याकाळी विज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात शेतातील पिकांचंही नुकसान झालं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? मंत्री जयकुमार गोरे म्हणाले…