• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Minister Jayakumar Gore Has Responded To The Local Body Elections

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? मंत्री जयकुमार गोरे म्हणाले…

न्यायालयाने स्थगिती उठवल्यावर तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, असे मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2025 | 12:30 AM
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? मंत्री जयकुमार गोरे म्हणाले...

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ व्हाव्यात, याठिकाणी काम करणार्‍यांना संधी मिळून लोकशाही बळकटी बळकट व्हावी, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तज्ञ वकिलांच्या नेमणुका केल्या असून, तात्काळ निकाल होण्याच्या दृष्टीने ते भूमिका मांडतील. त्यानंतर न्यायालयाने स्थगिती उठवल्यावर तात्काळ निवडणुका लागतील, असे मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

रामराजेंना पाठवलेल्या समन्सबाबत विचारले असता मंत्री गोरे म्हणाले, मलाही माध्यमांमधूनच याची माहिती मिळाली. तो तपासाचा भाग आहे. मुख्यमंत्रीही बारकाईने तपासावर लक्ष ठेवून आहेत. आपण जबाबदार पदावर काम करत असताना अशा गोष्टींमध्ये बोलणे योग्य नाही. परंतु, पोलीस ज्यांना ज्यांना तपासाला बोलावतील, त्यांना उत्तरे द्यावी लागतील. तपासाला बोलावले म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. मलाही पोलीस वारंवार तुम्ही एक कोटी रुपये कुठून आणले, हे विचारतात. त्याला मी उत्तर दिले. आता ज्यांना नोटीसी आल्या आहेत, त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत.

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार नितीन पाटील, आमदार दीपक पाटील यांनी पाठ फिरवली? यावर बोलतांना ते म्हणाले, हा पर्यटन विभागाचा कार्यक्रम आहे. आपल्या नियोजित कामांमुळे काहीजण येऊ शकले नसतील. उद्या मुख्यमंत्री त्याठिकाणी आहेत. आम्ही सगळे कार्यक्रमाला असणार आहोत. सगळे तिथे उपस्थित राहतील. याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. महायुती मजबूत आहे, प्रत्येकाच्या घरात छोटी-मोठी भांडणे होत असतात, त्यात काही वेगळे नाही.

जिल्ह्यात ग्रामविकासामध्ये कमी काम झाले आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांचा आदर्शवत कार्यक्रम राबवला. प्रत्येक विभाग, मंत्र्यांना शंभर दिवसांची उद्दिष्टे ठरवून दिले. त्या उद्दिष्टपूर्तीची दिशेने आपण चांगले काम केले. याचा आढावाही ते घेत असतात. त्यांच्या पाठपुरावामुळे शंभर दिवसांत महाराष्ट्र खूप वेगाने पुढे गेला आहे. यामध्ये काम करताना काही गोष्टी कमी जास्त झाल्या असतील. मंत्री, विभागांकडून कसे काम करून घ्यायचे, हे देवेंद्र फडणवीस यांनी या माध्यमातून दाखवून दिले आहे.

कर्तत्वान जिल्हाध्यक्ष मिळेल

भारतीय जनता पार्टीचा सातारा जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात स्थानिक पातळीवरून मी, अतुलबाबा व अन्य जणांकडून बंद पाकीटातून निरीक्षकांनी याची माहिती घेतली आहे. लवकरच प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांकडे ते सादर करतील. यावर ते योग्य निर्णय घेतील. त्यामुळे जिल्ह्याला खूप चांगला आणि कर्तत्वान जिल्हाध्यक्ष मिळेल, असा विश्वास मंत्री गोरे यांनी या प्रश्नावर बोलताना व्यक्त केला.

वारकरी सेवाभवनची निर्मिती

आषाढी वारीच्या नियोजनाची आढावा बैठकी घेतली आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. लाखो भाविक पायी चालत येतात. त्यांच्या सोयी-सुविधांबाबत वेगळे काय करता येईल, यादृष्टीने चर्चा सुरू आहे. गतुवर्षीच्या उणिवा भरून काढल्या जातील. पायी चालणार्‍या वारकर्‍यांसाठी वारकरी सेवा भवन उभारण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामध्ये दुखापतग्रस्त वारकर्‍यांवर उपचार व त्यांच्या पायांना मसाज करणे आदी सुविधा देण्यात येतील. याबाबत अतुलबाबांना जास्त माहिती आहे. त्यांनी पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर काम केले आहे. प्रयागराजच्या धर्तीवर काय सुविधा देता येतील, याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी संगितले.

जलजीवनच्या कामांचे नियोजन नाही

राज्यात जलजीवनच्या कामांचे व्यवस्थित नियोजन झाले नाही, याची मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. तत्कालीन अधिकार्‍यांनी त्यांच्या सोयीनुसार इस्टिमेट केले. त्याचा अभ्यास न केल्याने अनेक गावांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी नव्याने काही सुधारित योजना व त्यासाठीच्या निधीची तरतूद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत.

Web Title: Minister jayakumar gore has responded to the local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Jaykumar Gore
  • Karad news

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
4

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.