• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Minister Jayakumar Gore Has Responded To The Local Body Elections

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? मंत्री जयकुमार गोरे म्हणाले…

न्यायालयाने स्थगिती उठवल्यावर तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, असे मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2025 | 12:30 AM
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? मंत्री जयकुमार गोरे म्हणाले...

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ व्हाव्यात, याठिकाणी काम करणार्‍यांना संधी मिळून लोकशाही बळकटी बळकट व्हावी, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तज्ञ वकिलांच्या नेमणुका केल्या असून, तात्काळ निकाल होण्याच्या दृष्टीने ते भूमिका मांडतील. त्यानंतर न्यायालयाने स्थगिती उठवल्यावर तात्काळ निवडणुका लागतील, असे मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

रामराजेंना पाठवलेल्या समन्सबाबत विचारले असता मंत्री गोरे म्हणाले, मलाही माध्यमांमधूनच याची माहिती मिळाली. तो तपासाचा भाग आहे. मुख्यमंत्रीही बारकाईने तपासावर लक्ष ठेवून आहेत. आपण जबाबदार पदावर काम करत असताना अशा गोष्टींमध्ये बोलणे योग्य नाही. परंतु, पोलीस ज्यांना ज्यांना तपासाला बोलावतील, त्यांना उत्तरे द्यावी लागतील. तपासाला बोलावले म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. मलाही पोलीस वारंवार तुम्ही एक कोटी रुपये कुठून आणले, हे विचारतात. त्याला मी उत्तर दिले. आता ज्यांना नोटीसी आल्या आहेत, त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत.

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार नितीन पाटील, आमदार दीपक पाटील यांनी पाठ फिरवली? यावर बोलतांना ते म्हणाले, हा पर्यटन विभागाचा कार्यक्रम आहे. आपल्या नियोजित कामांमुळे काहीजण येऊ शकले नसतील. उद्या मुख्यमंत्री त्याठिकाणी आहेत. आम्ही सगळे कार्यक्रमाला असणार आहोत. सगळे तिथे उपस्थित राहतील. याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. महायुती मजबूत आहे, प्रत्येकाच्या घरात छोटी-मोठी भांडणे होत असतात, त्यात काही वेगळे नाही.

जिल्ह्यात ग्रामविकासामध्ये कमी काम झाले आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांचा आदर्शवत कार्यक्रम राबवला. प्रत्येक विभाग, मंत्र्यांना शंभर दिवसांची उद्दिष्टे ठरवून दिले. त्या उद्दिष्टपूर्तीची दिशेने आपण चांगले काम केले. याचा आढावाही ते घेत असतात. त्यांच्या पाठपुरावामुळे शंभर दिवसांत महाराष्ट्र खूप वेगाने पुढे गेला आहे. यामध्ये काम करताना काही गोष्टी कमी जास्त झाल्या असतील. मंत्री, विभागांकडून कसे काम करून घ्यायचे, हे देवेंद्र फडणवीस यांनी या माध्यमातून दाखवून दिले आहे.

कर्तत्वान जिल्हाध्यक्ष मिळेल

भारतीय जनता पार्टीचा सातारा जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात स्थानिक पातळीवरून मी, अतुलबाबा व अन्य जणांकडून बंद पाकीटातून निरीक्षकांनी याची माहिती घेतली आहे. लवकरच प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांकडे ते सादर करतील. यावर ते योग्य निर्णय घेतील. त्यामुळे जिल्ह्याला खूप चांगला आणि कर्तत्वान जिल्हाध्यक्ष मिळेल, असा विश्वास मंत्री गोरे यांनी या प्रश्नावर बोलताना व्यक्त केला.

वारकरी सेवाभवनची निर्मिती

आषाढी वारीच्या नियोजनाची आढावा बैठकी घेतली आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. लाखो भाविक पायी चालत येतात. त्यांच्या सोयी-सुविधांबाबत वेगळे काय करता येईल, यादृष्टीने चर्चा सुरू आहे. गतुवर्षीच्या उणिवा भरून काढल्या जातील. पायी चालणार्‍या वारकर्‍यांसाठी वारकरी सेवा भवन उभारण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामध्ये दुखापतग्रस्त वारकर्‍यांवर उपचार व त्यांच्या पायांना मसाज करणे आदी सुविधा देण्यात येतील. याबाबत अतुलबाबांना जास्त माहिती आहे. त्यांनी पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर काम केले आहे. प्रयागराजच्या धर्तीवर काय सुविधा देता येतील, याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी संगितले.

जलजीवनच्या कामांचे नियोजन नाही

राज्यात जलजीवनच्या कामांचे व्यवस्थित नियोजन झाले नाही, याची मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. तत्कालीन अधिकार्‍यांनी त्यांच्या सोयीनुसार इस्टिमेट केले. त्याचा अभ्यास न केल्याने अनेक गावांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी नव्याने काही सुधारित योजना व त्यासाठीच्या निधीची तरतूद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत.

Web Title: Minister jayakumar gore has responded to the local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Jaykumar Gore
  • Karad news

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
2

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
3

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
4

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.