Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातोरीतील दगडफेकीमागे कोणाचा हात?; मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितले

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांच्या मातोरी गावात गुरूवारी (२७ जून) सायंकाळी दोन गटात झालेल्या दगडफेकीमुळे वातावरण चांगलेच तापले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 28, 2024 | 01:29 PM
सौजन्य- Team Navrashtra

सौजन्य- Team Navrashtra

Follow Us
Close
Follow Us:

बीड :  मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी या गावात दगडफेक झाल्याने संपूर्ण गावात आणि इतर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. ही दगडफेक कोणी केली, का केली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत घटनेवरून  मनोज जरांगे या यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मंत्री छगन भुजबळांना दंगली घडवून आणायचा नाद आहे. राज्यात शांतता राहू द्यायची नाही, हा त्यांचा पहिल्यापासून स्वभाव आहे. हा विषय इतका सहज समजू नका, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळांनी त्यांना आपापल्या गाड्या फोडा, दगडं हाणा, काही चितावणी द्या, असं सांगितले असेल. राज्यात दंगली घडवून आणणे हेच भुजबळांचं स्वप्न आहे. हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे. हा विषय खूप गंभीर आहे, असेही जरांगेंनी यावेळी स्पष्ट केले.

छगन भुजबळांनीच वडीगोद्रीत आंदोलनकर्त्यांना उपोषण करायला सांगितले होते. पण आम्ही ओबीसी बांधवांना अजिबात दोष देणार नाही. कारण भुजबळांनीच त्यांना नादी लावले होते. त्यांनाच तिथे दंगल घडवून आणायची होती, वाद घडवून आणायचा होता, अशी टीकाही जरांगेंनी यावेळी केली. दोन समाजात संघर्ष घडवून आणायचा, पेटवा पिटवी करायची. गोरगरीब लोक अडचणीत आले पाहिजेत. ओबीसी आणि मराठा समाजातही जातीय तेढ निर्माण करण्याचा त्यांचा धंदा आहे, असा घणाघात मनोज जरांगेंनी यावेळी बोलताना केला.

काय आहे नेमकं प्रकरण?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांच्या मातोरी गावात गुरूवारी (२७ जून) सायंकाळी दोन गटात झालेल्या दगडफेकीमुळे वातावरण चांगलेच तापले होते. ओबीसी समाजाने प्रा.लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या स्वागतासाठी काढलेल्या रॅलीवर दगडफेक झाल्याने मातोरी परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

हाकेंच्या स्वागतासाठी आलेल्या रॅलीतील दोन गटात काही कारणास्तव वाद झाला आणि त्यानंतर दोन्ही गटात तुफान दगडफेक सुरू झाली. जवळपास अर्धा तास ही दगडफेक सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण परिस्थिती निंयत्रणाखाली आणली. पण मध्यरात्री पुन्हा एकदा शिंगोरी फाटा, बोरगाव फाटा याठिकाणी जमावाने काही वाहनांची तोडफोड केली.

या दगडफेकीत अनेक दुचाकींसह वाहनांची तोडफोड झाल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण ही दगडफेक नेमकी कोणी केली, का केली, आणि कोणत्या कारणावरून वाद झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण-विशाखापट्टणम या महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.

 

Web Title: Whose hand behind stone pelting in matori manoj jarange clearly said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2024 | 01:29 PM

Topics:  

  • Chagan BhujBal
  • Maharashtra Political News
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

Supreme Court: ‘नाहीतर निवडणुकाच रद्द करू…’; सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
1

Supreme Court: ‘नाहीतर निवडणुकाच रद्द करू…’; सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी
2

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.