(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
यंदाच्या सर्वात चर्चेत असलेल्या आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला ‘निशाणची’ आता प्रदर्शानाच्या तयारीत आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ यांसारखे कल्ट क्लासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा हा चित्रपट आहे. यात ऐश्वर्य ठाकरेने अभिनयात पदार्पण केले आहे. अभिनेत्याच्या जोडीला वेदिका पिंटो देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे. नव्या जोडीच्या केमिस्ट्रीने आणि ऐश्वर्यच्या पदार्पणामुळे आधीपासूनच चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता निर्माण झाली आहे.
कालच या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आणि काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. कथानकातील गुंतवणूक, दमदार संवाद, आणि मुख्य कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे ट्रेलरला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटामध्ये दोन जुळ्या भावांची कथा पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये प्रेमकथा देखील पाहायला मिळणार आहे. तगड्या स्टारकास्टसह हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीस; कुरळे ब्रदर्स घेऊन येताहेत हास्याचा डबल धमाका!
या ट्रेलरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर, ऐश्वर्य ठाकरे, त्यांची आई स्मिता ठाकरे आणि सहकलाकार वेदिका पिंटो हे तिघेही मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. यावेळी या तिघांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आगामी चित्रपटासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहे. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत, चित्रपटाभोवतीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘निशाणची’ च्या ट्रेलरमध्ये ऐश्वर्य ठाकरे हा बबलू आणि डबलू या जुळ्या भावांची दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे, हे दोघेही दिसायला सारखे पण विचारांनी आणि स्वभावाने संपूर्ण भिन्न आहेत. २००० च्या दशकातल्या उत्तर प्रदेशातील छोट्या शहरात घडणारी ही कथा प्रेम, संघर्ष, द्वेष आणि गुन्हेगारीने भरलेली आहे. बबलूचं रिंकूवरील प्रेम असो किंवा डबलूचा अडथळा निर्माण करणारा स्वभाव ट्रेलरमधून अॅक्शन, इमोशन आणि थराराचा भरपूर अनुभव पाहायला मिळतो आहे.
फसवणूक प्रकरणात शिल्पा आणि राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी, मुंबई पोलिसांनी बजावले LOC समन्स
हा चित्रपट अनुराग कश्यप यांच्या खऱ्या आणि थेट शैलीतील कथाकथनातला आणखी एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे. चित्रपटात ऐश्वर्य आणि वेदिका यांच्यासह मोनीका पंवार,मोहम्मद झिशान अय्युब, आणि कुमुद मिश्रा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अजय राय आणि रंजन सिंग यांच्या Jar Pictures आणि Flip Films यांच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती झाली आहे. कथालेखन प्रसून मिश्रा, रंजन चंदेल, आणि अनुराग कश्यप यांनी मिळून केले आहे. हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण चित्रपटगृहात दाखल होणार आहे.