(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी अलीकडेच ZEE5 वर प्रदर्शित होत असलेल्या ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. सासू–सुनांच्या बदलत्या नातेसंबंधांवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
हा चित्रपट सासू–सुनांच्या बदलत्या नातेसंबंधांवर आधारित असून, त्यातील हलकंफुलकं हास्य आणि नात्यांचे सूक्ष्म पैलू प्रेक्षकांच्या मनावर घर करत आहेत. निर्मिती सावंत यांच्या मते, या चित्रपटात कॉमेडीमधून गंभीर सामाजिक संदेश प्रभावी पद्धतीने दिला गेला आहे. प्रेक्षकांना मनोरंजनासोबत नात्यांवर विचार करायला भाग पडणारा हा चित्रपट असल्यामुळे तो लवकरच लोकप्रिय होतोय.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सावंत यांनी विनोद आणि अर्थपूर्ण संदेश यांचा समतोल किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट केले. आजच्या तणावपूर्ण जगात गंभीर गोष्टी कॉमेडीच्या माध्यमातून मांडल्या तर त्या प्रेक्षकांना अधिक सहजपणे स्वीकारता येतात, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, “कॉमेडीच्या माध्यमातून जर तुम्ही गोड पद्धतीने कठोर सत्य मांडले, तर लोक ते सहज स्वीकारतात. थेट कडू सत्य लोक नाकारतात, पण विनोदामुळे तो संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचतो.”
चित्रपटाच्या मुख्य विषयावर बोलताना त्यांनी नात्यांमधील बदलांवर भाष्य केले. प्रत्येक नातं काळानुसार बदलत असतं आणि त्या नात्यांची खरी ताकद ही स्वतःमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये आणि प्रगतीत असते, असे त्यांनी सांगितले. “आपण आधी व्यक्ती आहोत, त्यानंतर नाती येतात. आपण स्वतःमध्ये बदल आणि प्रगती केली, तर प्रत्येक नातं अधिक मजबूत होऊ शकतं,” असे त्यांनी पुढे सांगितले.
सावंत यांनी हेही सांगितले की, प्रत्येक भूमिकेसोबत त्या स्वतःला अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतात आणि काहीतरी नवीन शोधण्याची त्यांची सततची धडपड असते.
बिपाशा बासूला मिळली ‘The Traitors’ची ऑफर; करण जोहरच्या रिॲलिटी शो ला दिला नकार? स्वतःच सांगितले कारण
OTT प्लॅटफॉर्म्सच्या प्रभावाबद्दल बोलताना त्यांनी त्यांना आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे मानले. त्यांनी एक अनुभव सांगितला की, ऑनलाइन त्यांचे काम पाहिलेल्या प्रेक्षकांनी त्यांचे लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी हजेरी लावली, ज्यामुळे डिजिटल माध्यमांमुळे प्रेक्षकवर्ग वाढतो हे अधोरेखित झाले. तसेच ZEE5 सारखे प्लॅटफॉर्म मराठी कंटेंटला जागतिक स्तरावर पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.






