(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सोशल मीडियावर अभिनेत्रींचे फोटो व व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने एडिट किंवा मॉर्फ करून शेअर करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सोशल मीडियाच्या याच चुकीच्या वापराबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिचं मत व्यक्त केलं आहे. प्राजक्ता माळी हे नाव सध्याच्या घडीला मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत अग्रस्थानी आहे. वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपट, तसेच रिअॅलिटी शोजमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयातील सादरीकरणाबरोबरच प्राजक्ताचं नृत्यकौशल्य देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेलं आहे.
सोशल मीडियाच्या याच चुकीच्या वापराबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिचं मत व्यक्त केलं असून तीने नुकताच ‘MHJ Unplugged’ सोबत संवाद साधला. ती सध्याच्या काळात समाजमाध्यमांकडे कशी बघते,असं प्रश्न विचारला गेला. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची भीती वाटली नव्हती पण आता मला सोशल मीडियाची भीती वाटते. मला एकदा सायब्रर क्राईम महासंचालकांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा तर त्यांनी मला एका वेगळ्याच गोष्टीची माहिती दिली. त्याच सायबर पोलिसांनी दोन मुलांना पकडलं होतं त्याचं वय साधारण १९-२० वर्ष होतं. ज्यांना माहितच नव्हतं की ते आयुष्यात काय करत आहेत. त्यातील एकाला मला त्यांनी फोन लावून दिला. तर त्याला मी विचारलं की तू असं का केलंस. त्याने एक प्रोफाईल उघडलं होतं. त्याच्यामध्ये फक्त माझे खराब व्हिडीओ होते. त्यावर मी त्याला विचारलं की तू हे का केलंस? तर त्याचं उत्तर असं होतं की, ‘तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होता म्हणून मी केलं’. खरंतर तो माझा चाहता होता. काहीही टाकायचं म्हणून त्याने ते टाकलं होतं. शिवाय त्याला हेही कळतं नव्हतं की त्याने काय केलंय. त्यावेळी मला विनंती करत तो मुलगा म्हणाला, ‘कृपया माझ्या घरी हे सांगू नका, कारण माझे वडील मला चाबकाने मारतील’. ही शेवटची विनंती त्याने मला केली होती.”
राणी मुखर्जी आणि काजोल का झाल्या भावुक, दुर्गा पूजा करताना काय घडलं?
पुढे प्राजक्ता म्हणाली, ”मला त्यांनी फोन लावून दिला. तर त्याला मी विचारलं की, तू असं का केलंस. तर त्याचं उत्तर असं होतं की, ‘तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होता म्हणून मी केलं’. खरं तर तो माझा चाहता होता. काहीही टाकायचं म्हणून त्यानं ते टाकलं होतं. त्याशिवाय त्याला हेही कळतं नव्हतं की, त्यानं काय केलंय. त्यावेळी मला विनंती करीत तो मुलगा म्हणाला, ‘कृपया माझ्या घरी हे सांगू नका. कारण- माझे वडील मला चाबकाने मारतील..”
मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहून संकर्षण कऱ्हाडेने केलं मदतीचं आवाहन, म्हणाला, ”हे फार क्लेशदायक..”
या संवादानंतर ती सर्वांना आवाहन करीत म्हणाली, तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. मीदेखील हे करीत नाही. मला ती गोष्ट फार आवडते, ज्यामध्ये एक मोठा हत्ती आहे आणि चार माणसं असतात. एकाच्या हातात शेपूट आलं. एकाच्या हातात सोंड आली, तर तिसऱ्याच्या हातात पाय आला, त्यानुसार ते त्यांचं नट बनवतात. अशी परिस्थिती आहे. खरं सत्य आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. आपल्याला पूर्ण चित्र माहीतच नसतं. त्याशिवाय जे काही आपल्या हाताला लागतं, त्यावरच आपण बोलत असतो. म्हणून सावधगिरी बाळगा.”