भारताच्या संघाने जून महिन्यामध्ये T२० विश्वचषक नावावर केला. यामध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडिया विश्वविजेती झाली. भारताच्या संघाने आतापर्यत चार विश्वचषक जिंकले आहेत. यामध्ये १९८३, २००७, २०११ आणि २०२४ हे चारही विश्वचषक भारतीय खेळाडूंसाठी आणि चाहत्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. याच विश्वचषकांमुळे भारतीय क्रिकेटला नवी दिशा मिळाली आहे. वर्ष २००७ यावर्षी आयसीसीने पहिला T२० वर्ल्ड कप आयोजित केला होता. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली. नवा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या स्पर्धेत खेळत होती. धोनी आणि भारतीय क्रिकेटच्या नशिबी २००७ साली काहीतरी वेगळंच होतं. या दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी भारताने पहिला T२० विश्वचषक जिंकला आणि येथून 'माही युग' सुरू झाले.
भारताच्या संघाने २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून जेतेपद केलं नावावर. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी उर्फ माही हा भारतीय क्रिकेट कर्णधारांपैकी सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
२००७ मध्ये स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्याही क्रिकेटप्रेमीसाठी स्वप्नवत होता कारण हा विजेतेपदाचा सामना दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळला गेला होता. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये पहिल्या विजेतेपदासाठी लढत झाली होती. जोहान्सबर्गमधील न्यू वँडर्स स्टेडियम हे मैदान होते, जिथे भारताने अखेरच्या षटकात पाकिस्तानचा दमदार पराभव करून विजेतेपद पटकावले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताच्या क्रिकेट संघाने धोनीच्या नेतृत्वखाली २००७ मध्ये T२० विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक नावावर केला होता. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताने २४ वर्षांनंतर विश्वविजेतेपद पटकावले होते. यापूर्वी टीम इंडियाने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. फोटो सौजन्य - सोशल मीडिया