पिकलेले रसाळ हापूस आंबे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. गोड चवीचा आंबा तोंडाची चव वाढतो. याशिवाय आंबा खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण काहीवेळा आंबा खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे आंब्याच्या फोडी करून खाण्याऐवजी आंब्यांपासून बनवलेले पदार्थ खावेत. हे पदार्थ तोंडाची चव वाढवण्यासोबतच शरीरासाठी सुद्धा उपयुक्त ठरतात. उन्हाळ्यात भूक लागल्यानंतर तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी आंब्यापासून बनवलेले पदार्थ खावेत. (फोटो सौजन्य – pinterest)
उन्हाळ्यात पिकलेल्या हापूस आंब्यांपासून बनवा 'हे' चविष्ट पदार्थ, पदार्थ पुन्हा पुन्हा खाण्याची होईल इच्छा

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कच्च्या कैरीपासून बनवलेले पन्ह प्यावे. पन्ह प्यायल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि थंडावा कायम राहतो.

सकाळच्या नाश्त्यात मुलांना ब्रेड किंवा टोस्ट खायला देण्याऐवजी मँगो ज्यूस किंवा मँगो मिल्कशेक बनवून पिण्यास द्यावे. यामुळे मुलांचे पोट सुद्धा भरलेले राहील.

रायवळ आंब्यांपासून कोकणात आंब्याचे सासव किंवा कढी बनवली जाते. हा पदार्थ गरमागरम भातासोबत तुम्ही खाऊ शकता. मेथी दाणे आणि कडीपत्याची फोडणी देऊन बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

अक्षय तृतीय किंवा सणावाराच्यादिवसांमध्ये आंब्यांपासून बनवला जाणारा फेमस पदार्थ म्हणजे आमरस. गरमागरम पुरी आणि आमरस हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागते.

आंब्यापासून थंड पदार्थ खाण्याची इच्छा आंब्याचे आईस्क्रीम किंवा पुडिंग बनवावे. हे पदार्थ डेजर्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता.






