उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामावाटे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. सतत येणाऱ्या घामामुळे खूप जास्त थकल्यासारखे वाटते. तर काहीवेळा अचानक चक्कर येते. अशावेळी भरपूर पाण्याचे सेवन करावे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाताना सोबत पाण्याची बाटली घेऊन जावे. काहीवेळा उन्हात गेल्यामुळे खूप जास्त अस्वस्थपणा जाणवू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
वाढत्या उन्हामुळे अस्वस्थपणा जाणवतोय? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

जास्त वेळ उन्हात बाहेर गेल्यामुळे डोळ्यांची, तळपायाची जळजळ होते आणि उष्णता वाढल्यामुळे अस्वस्थपणा वाढू लागतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लासभर चिया सीड्सचे पाणी प्यावे.

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे पोटात थंडावा कायम टिकून राहतो आणि आरोग्य सुधारते. आतड्यांमध्ये चांगले विषाणू वाढवण्यासाठी ताक प्यावे.

संध्याकाळच्या वेळी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी कोकम सरबत, कैरीचे पन्ह किंवा विविध फळांचा रस प्यावा. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात चमचाभर तूप मिक्स करून प्यावे. यामुळे पोटात थंडावा राहील आणि आतड्यांची हालचाल सुलभ होईल.

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन करावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाण्यात असलेल्या गुणकारी घटकांमुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.






