अकोला–खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या कामातील हलगर्जीपणाचा फटका आता शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. योग्य निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे हिवरखेड परिसरातील अधिग्रहण न झालेल्या तब्बल 300 हून अधिक एकर शेतीत पावसाचे पाणी साचले असल्याचा आरोप आहे. अनेक ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी साचल्याने शेती पूर्णपणे जलमय झाली असून पिकांसह सुपीक जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
अकोला–खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या कामातील हलगर्जीपणाचा फटका आता शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. योग्य निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे हिवरखेड परिसरातील अधिग्रहण न झालेल्या तब्बल 300 हून अधिक एकर शेतीत पावसाचे पाणी साचले असल्याचा आरोप आहे. अनेक ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी साचल्याने शेती पूर्णपणे जलमय झाली असून पिकांसह सुपीक जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला.






