देवेंद्र फडणवीस यांची साताऱ्यात मोठी घोषणा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. आज सातारा येथील प्रधानमंत्री आवास योजना कार्यक्रमात बोलताना त्यांनी हि मोठी घोषणा केली यावेळी ते म्हणाले, “कांद्याचा शेतकरी अडचणीत आहे. अनेक शेतकरी कांद्याला एक रुपया भाव मिळतोय म्हणून रस्त्यावर फेकून द्यायला निघाले आहेत. म्हणून मी शिवराज चौहान यांना हा कांदा विकत घ्यायची विनंती केली. त्यानुसार, आजपासून महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दराने कांदा विकत घ्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.,” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
यावेळी सभेला संबोधित करताना ते पुढे म्हणाले, “येत्या आठवड्यात आपण साखर कारखानदारीबाबतची एक बैठक घेणार आहोत ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलं, त्यांना प्रोत्साहनपर राशी दिल्या जातील,” अशी घोषणा त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे सातारा येथे ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ व ‘महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ येथे उपस्थित होते. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित होते.
“कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांचे संसार मोडले!” अशा संतप्त घोषणा देत आज पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आक्रमक ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. भररस्त्यात कांदा ओतून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संघर्ष छेडला जाईल.
कांद्याला तातडीने रास्त हमीभाव लागू करा.
प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा.
निर्यात धोरण स्थिर ठेवा आणि जाचक अटी रद्द करा.
प्रत्येक तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करून साठवणूक क्षमता वाढवा.
“गडकरी मुख्यमंत्री असते तर…” प्रणिती शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा






