Maharashtra Politics: राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
CM Devendra Fadnavis Air Travel Restrictions : देशाच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आवाहनाची महाराष्ट्रात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या हवाई प्रवासावर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी, अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने विमान प्रवास करावा असे निर्देश दिले आहेत.
स्वतःचे उदाहरण देताना बावनकुळे म्हणाले की, मी वर्षातून केवळ मोजक्याच वेळा विमान प्रवास करतो. तर बहुतेक कामे ऑनलाईन बैठकीद्वारे पूर्ण करतो. राज्य सरकारच्या या निर्णयाचा परिणाम आता वेगवेगळ्या विभागामध्येही दिसू लागला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निर्देशांचा विविध विभागांमध्ये आधीच परिणाम दिसून येत आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनीदेखील आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना, सर्व आढावा बैठका केवळ ऑनलाइनच माध्यमांतून पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामुळे प्रवासाचा खर्च, वेळ आणि यांची बचत व्हावी, हा यामागचा उद्देश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, इंधनाचा वापर कमी करण्यासाठी, अधिकाऱ्यांना आता अधिकृत कामासाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
या निर्णयामाहे बाताच्या परकीय चलन साठ्यावर वाढत असलेला दबाव हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. भारताला तेल, वायू, खते, खनिजे, सोने यांसारख्या वस्तूंची आयात करताना डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. जागतिक संकट आणि वाढत्या आंततरष्ट्रीय किंमतींमुळे आयातीवरील खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि राज्य सरकारची काटकरसीची भूमिका ही डॉलरची बचत आणि अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
राज्य सरकारचा विश्वास आहे की, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काटकसरीचा आदर्श निर्माण केल्यास नागरिकांमध्येही बचतीबाबत जागरूकता वाढेल. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी ऑनलाइन संवाद वाढवल्यास प्रशासकीय खर्चात मोठी घट होऊ शकते. भविष्यातील आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी हे पाऊल “खबरदारीचा उपाय” म्हणून पाहिले जात आहे.
PM Modi on Work From Home : नरेंद्र मोदींकडून ‘वर्क-फ्रॉम-होम’ चे आवाहन!काटकसर की संकटाची चाहूल?
या काळात केवळ शासकीय स्तरावरील बचत पुरेशी ठरणार नाही. नागरिकांनीही अनावश्यक सोने खरेदी टाळावी, इंधनाचा जपून वापर करावा आणि परदेश प्रवास पुढे ढकलावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नैसर्गिक शेतीचा अवलंब आणि स्थानिक उत्पादनांचा वापर वाढवल्यास देशांतर्गत अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असे सरकारचे मत आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेली ही पावले राष्ट्रीय आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर राज्य नेतृत्वाची कटिबद्धता दर्शवणारी मानली जात आहेत.






