
रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित !
राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील कथित जाचक अटी हटवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सरकारने या अटी-शर्तींचा पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवल्यानंतर tयांनी हा निर्णय घेतला आहे.
याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटले कि, सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचं नाव दिलं परंतु अटीशर्ती टाकल्यामुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार होते आणि हा एकप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही अवमान आहे, ही गोष्ट पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु करुन आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर सुरवातीला अटीशर्ती नाकारणारं सरकार आता या अटीशर्ती काढण्याबाबत तयार झालं, हे या आंदोलनाचं यश आहे.”
सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचं नाव दिलं परंतु अटीशर्ती टाकल्यामुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार होते आणि हा एकप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही अवमान आहे, ही गोष्ट पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु करुन आम्ही… pic.twitter.com/RmmD1deg0q — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 15, 2026
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी काल (रविवार, 14 जुन) आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी, म्हणजेच २२ जूनपूर्वी मुंबईत बैठक आयोजित करून कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमधून सांगितले.
‘तृणमूल’ मध्ये बंडखोरीला नवे वळण, बंडखोर खासदार होणार नव्या पक्षात विलीन, NDA ला देणार पाठिंबा?
या आश्वासनानंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या नामदेव पायरी येथे महाआरती करून उपोषणाची औपचारिक सांगता करण्यात आली. यावेळी उपोषणकर्ते, वारकरी, शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या ट्विटमधून ते म्हणाले, “आता सरकारने विठुरायाच्या पवित्र भूमीत येऊन कर्जमाफी योजनेतील अटीशर्ती काढण्याचा शब्द दिल्याने ते दिलेला शब्द पाळतील आणि राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देतील, अशी अपेक्षा आहे. परंतु मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर मात्र रस्त्यावरची मोठी लढाई लढणार, ही बाबही सरकारने लक्षात घ्यावी. या आंदोलनाला पाठिंबा दिलेले राज्यभरातील शेतकरी, महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष, विविध संस्था, संघटना, प्रत्यक्ष येऊन भेटलेले नेते, फोनवरून आणि सोशल मिडियातून पाठींबा दिलेले सर्वजण तसंच माझ्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिलेलं माझं कुटुंब या सर्वांचेच मनापासून आभार!”
अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. त्या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शेतकरी नेते कॉ. अजित नवले, वामनराव चटप, महादेव जानकर, प्रवीण गायकवाड आणि रविकांत तुपकर यांचा समावेश असणार आहे.