
Intense Politics in the Wai Assembly Constituency Rural Development Minister Jaykumar Gore's Aggressive Strategy
विशेष म्हणजे, हा विस्ताराचा प्रयत्न थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या बालेकिल्ल्यात होत असल्याने या हालचालींना अधिकच राजकीय धार प्राप्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभांमधून नेमके काय संदेश दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मकरंद आबांच्या प्रभाव क्षेत्रातच भाजपने जाहीर मेळावे घेण्याचा निर्णय घेतल्याने हा केवळ संघटन विस्तार नसून थेट राजकीय आव्हान असल्याचे स्पष्ट होत आहे.
बावडा, पळशी, मांढरदेव आणि जांब यांसारख्या भागांमध्ये हालचाली केल्यानंतर आता वाई शहरात मोठा मेळावा घेण्याची भाजपची तयारी ही पुढील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखलेली रणनीती मानली जात आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी आळीपाळीने मतदारसंघात सक्रिय राहून स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे वाईतील पारंपरिक राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा : चारित्र्यावरुन संशय अन् मारहाण; वडगाव मावळमध्ये जोडीदारानेच घेतला पत्नीचा जीव
दरम्यान, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि मकरंद पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रमुख शिंदे यांच्या उडतरे गावात भाजपने ‘बेरजेचे राजकारण’ करत आपली घुसखोरी वाढवण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. तसेच, ऋतुजा शिंदे आणि ऋषिकेश धायगुडे पाटील यांना सभापतीपदे देत भाजपने स्थानिक नेतृत्व तयार करण्यावर भर दिला आहे. ही पावले मकरंद पाटील यांना लक्ष्य करतच उचलली गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हे देखील वाचा : धीरेंद्र शास्त्री पुन्हा बरळला! छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्याने पेटला वाद
या सर्व घडामोडींमुळे वाई मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकांमध्ये ही स्पर्धा उघड संघर्षात परिवर्तित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाईतील राजकारण येत्या काळात अधिकच टोकदार आणि चुरशीचे होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.