Satara Mahayuti Conflict: साताऱ्याच्या राड्यामुळे सरकार धोक्यात? शिंदे गटाच्या नेत्यांकडून राजीनाम्याचा इशारा
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेवर पक्षपातीपणाचा आरोप करत थेट निशाणा साधला आहे. “प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली काम केले?” असा सवाल करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत, “भाजपकडून सतत आमची गळचेपी होत असून ही बाब आता सहन केली जाणार नाही,” अशा भावना व्यक्त केल्या. काही मंत्र्यांनी तर गरज पडल्यास थेट राजीनामे देण्याची तयारी दर्शवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकीकडे शिंदे यांच्या दालनात रणनीती ठरत असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असतानाही भाजपने माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. “कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा ठाम पवित्रा भाजपकडून घेण्यात आला आहे. या सत्तासंघर्षामुळे महायुतीमधील समन्वय धोक्यात आला असून, आगामी काळात याचे काय परिणाम होतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सातारा जि.प. अध्यक्षपद निवडणुकीतील गोंधळाचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. सत्ताधाऱ्यांतच जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचे चित्र होते. उपसभापती नीलम गोडे यांनी सातारा पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले. तसेच सखोल चौकशीचे निर्देश विभागीय आयुक्तांना देण्यात आले. मात्र, या निर्णयाला मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध दर्शवला. या सर्व घडामोडींमुळे सत्ताधारी आघाडीतच अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे स्पष्ट झाले. या मुद्द्द्यावरून सभागृहात सत्ताधाऱ्यांमध्येच वाद पेटला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली. तर गोरे यांनी निलंबन मागे घेण्याचा आग्रह धरला.
66 वस्तुस्थिती न जाणता इतक्या मोठ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. अपहरणाची तार नौदल्यावर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, ४ हजार लोक जि.प.त घुसले. त्यांना कोणी आणले?
– जयकुमार गोरे, मंत्री, भाजप
मंत्र्यांवर हल्ला गंभीर, पोलिस पक्षपाती वागले
6 सही गभीर बा आहे. माझ्या अंगावर रक्त सांडले. अशा परिस्थितीतच एसपीच्यावर निलंबनाची ही कारवाई झाली आहे. मुळातच या प्रकरणात पोलिस प्रशासनानेही पक्षपाती भूमिका घेतली आहे.
– शंभूराज देसाई, मंत्री, शिवसेना
सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या प्रिया शिंदे यांना बहुमत नसतानाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदी बसवले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ५ सदस्यांना फोडून भाजपने ही मोहीम फत्ते केली. तसेच राष्ट्रवादीच्या २ सदस्यांना पोलिसांनी सभागृहात जाण्याआधीच अटक केली, यामुळे दोघांनाही मतदान करता आले नाही. याचाही भाजपला थेट फायदा झाला. याच अटकेवरून राज्याच्या राजकारणात वादळ आले आहे. जिल्हा परिषदेच्या दोन मतदारांना मतदान करण्यापासून रोखल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना आपल्या सदस्यांना सभागृहात आणताना पोलिसांशी झुंज द्यावी लागली. या धक्काबुकीत देसाई जखमी झाले, तर पाटील यांना पोलिसांनी घेरल्याची घटना घडली होती.






