
MP Sanjay Raut press confernce on two ncp merge together political News
अजित पवार यांच्या निधनानंतर खासदार संजय राऊत यांनी अनेकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत आणि अजित पवारांच्या निधनावर संशय व्यक्त केला आहे. यावरुन त्यांच्यावर अनेकांनी टीका देखील केली. यानंतर आता खासदार राऊत यांनी “विलिनीकरणाचा विषय त्यांच्यावर सोडाना आणि यात शिवसेनेचा काय संबंध अशी भूमिका घेतली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय त्यांच्यावर सोडा ना. आपण कशाला त्यात मध्ये पडायचं? यात शिवसेनेचा काय संबंध? हा त्यांचा विषय असेल तर त्यांनी त्यातून मार्ग काढावा किंवा निर्णय घ्यावा. प्रत्येकवेळी तुम्ही इतर पक्षाच्या नेत्यांना विचारणार,” असे मत खासदार राऊतांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार यांच्याकडेच असतील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे; येत्या 9 फेब्रुवारीला…
पुढे ते म्हणाले की, “विलिनीकरण हा त्यांचा विषय आहे. पण सध्या सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतायत हे फार इंटरेस्टिंग आहे. अजित पवार यांच्या दु:खद निधनानंतर या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जोरात सुरु झालं. विशेषत: अजित पवार गटाकडून. ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं. पद आणि प्रतिष्ठा दिली. ताकद दिली. ते आता शरद पवार यांनी काय करावं आणि काय करु नये असे सल्ले देतायत. हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे,” असा टोला खासदार राऊतांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : तत्परतेने टोल वसुली, सरकारचा कोडगेपणा अनाकलनीय; राज ठाकरेंनी वाहतूक कोंडीवरुन जोरदार झापलं
शरद पवार यांनी काटेवाडीतील घरी भेट दिला आहे. तसेच यावरुन राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु असताना यावर संजय राऊत म्हणाले की, “सुनेत्रा ताईंनी त्यांचा पती गमावला आहे. शरद पवार यांनी फक्त पुतण्या नाही तर मुलासारख्या अजित पवारांना गमावलं आहे. शरद पवार त्यांच्या सूनबाईच्या घरी गेले असतील, तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचाराव असं काही नाही. शरद पवार साहेब अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आमचा विषय इंडिया ब्लॉकशी, महाविकास आघाडीशी संबंधित आहे. शरद पवारांचा पक्ष मविआ आणि इंडिया ब्लॉगचा सदस्य आहे. एक गट म्हणतो चर्चा झाली, एक म्हणतो चर्चा झाली नाही. यात विश्वास कोणावर ठेवायचा” असं संजय राऊत म्हणाले आहेत.