Manoj Jarange Mumbai Protest:जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांचा सलग दुसरा झटका! आझाद मैदानावर उपोषणाला पुन्हा परवानगी नाकारली
Manoj Jarange Mumbai Protest: मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि सरकारच्या आश्वासनांच्या अंमलबजावणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा धक्का दिला आहे. आझाद मैदान पोलिसांनी रविवारी पहिला अर्ज फेटाळल्यानंतर जरांगे यांच्या वतीने नव्याने आंदोलनाची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदाही आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारली आहे.
गणेशोत्सवानंतर आझाद मैदान वगळता अन्य ठिकाणी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी दिली जाऊ शकते, असे पत्र मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील पुढील भूमिका काय घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
मनोज जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबरपासून मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर अनिश्चित काळासाठी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, पोलिसांनी सलग दोनदा परवानगी नाकारल्याने त्यांचा मुंबई मार्च आणि १९ सप्टेंबरपासूनचे उपोषण याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
मुंबई पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या संभाव्य समस्यांचा दाखला देत आझाद मैदानावर परवानगी नाकारल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षीच्या आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे पाच हजार वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप
आजपासून (१४ सप्टेंबर) मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील परिस्थिती संवेदनशील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
तसेच, आझाद मैदानातील सुमारे ७,००० चौरस मीटर जागेत नियमांनुसार मर्यादित संख्येने आंदोलकांना सामावून घेता येते. मात्र, जरांगे पाटील यांनी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास दक्षिण मुंबईतील रुग्णालये, न्यायालये आणि आर्थिक केंद्रांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली असली तरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आपण एकट्याने मुंबईला जाणार असून, आपल्यासोबत इतर कुणीही मुंबईला येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली असली तरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आपण एकट्याने मुंबईला जाणार असून, आपल्यासोबत इतर कुणीही मुंबईला येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे मुंबई पोलिसांनी सलग दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील आझाद मैदानाऐवजी अन्य ठिकाणी उपोषण करणार का, आपल्या भूमिकेवर ठाम राहत मुंबई गाठणार का किंवा परवानगीसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






