
Abhijeet Dipke, CJP, Cockroach Janata Party
या मुलाखतीत अभिजीत दिपके यांनी त्यांचे सहकारी सौरव दासबद्दल एक किस्सा सांगितला आहे. मुलाखतीवेळी बोलताना अभिजीत दिपके म्हणतात की, “आम्ही मार खाऊनही उभारी घेणारे लोक आहोत. जयपूरमध्ये मला मारहाण झाली, गेल्या आठवड्यात आशुतोष रांकाला मारहाण झाली. आता फक्त सौरव उरला आहे. सौरव तुझी पण वेळ येणार आहे.” असा गंमतीशीर शब्दांत अभिजीत दिपके यांनी सौरव दास यांना सूचक इशारा दिला आहे.
सुप्रिया सुळेंबाबतचं ‘ते’ वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी घेतलं मागे; म्हणाले, ‘अनावधानाने उल्लेख झाला…’
अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यात दौऱ्यावर होते. जूनमध्ये राजस्थानमधील जयपूर येथे एका आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला झाला होता. दीपके जयपूरमध्ये जमलेल्या आंदोलकांना संबोधित करण्यासाठी जात असताना, त्यांच्या एका समर्थकाने त्यांना खांद्यावर उचलले. यावेळी जमावातील एका व्यक्तीने त्यांना थप्पड मारली आणि खाली खेचण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या हल्ल्यामागे आरएसएसशी संबंधित काही लोक असल्याचा आरोप दीपके यांनी केला. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.
तर चार दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका आणि काही कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. रांका आणि सीजेपीचे कार्यकर्ते जयपूरच्या बागरू विधानसभा मतदारसंघातील एका सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. रांका यांनी सांगितले की, या हल्ल्यात सीजेपीच्या एका कार्यकर्त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. रांका यांनी या घटनेत भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.
या घटनांच्या आधारे, न्यूज 24ला दिलेल्या मुलाखतीत दीपके गंमतीने सौरव दास यांना, आता फक्त दासच उरले आहेत आणि त्यांचाही नंबर लागणार आहे, असा गंमतीशीर इशारा दिला आहे.