राज ठाकरेंचा संजय दिना पाटलांवर निशाणा
मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. मतदार यादी, बूथ लेव्हल एजंट (BLA) नोंदणी आणि संघटनात्मक बांधणीवर भर देत त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आतापासूनच मैदानात उतरून काम करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून चांगलाच समाचार घेतला.
संजय दीना पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत राज ठाकरे म्हणाले की, एखादा गँगस्टर करणार नाही अशी भाषा एक खासदार बोलतोय. तसेच, या वक्तव्यानंतर कोणत्याही प्रकारची चौकशी होत नसल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारवरदेखील टीकास्त्र सोडले.
मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नाव न घेता शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका केली. “एक खासदार म्हणतो मी पाच खून केले, बॉम्ब फोडीन. अशी भाषा एखादा गँगस्टरही बोलणार नाही. मग लोकप्रतिनिधी अशी भाषा कशी वापरतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “कुठले खून केले? कुठे बॉम्ब फोडले? अशा वक्तव्यांनंतरही चौकशी होत नाही, ही गंभीर बाब आहे,” असे म्हणत त्यांनी कायद्याच्या अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित केले.
MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा
राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. सत्तेचा आणि पैशाचा वापर करून पक्षफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “देशात गंभीर परिस्थिती आहे. भाजपमधील अनेक लोकही या परिस्थितीमुळे त्रस्त आहेत. भविष्यात सत्तांतर झाल्यास सर्वाधिक आनंद भाजपमधीलच काही लोकांना होईल,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी BLA नोंदणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत मुंबईत मोठ्या प्रमाणावर बूथ स्तरावरील यंत्रणा उभारण्यावर भर दिला.






