
Resentment in Naigaon over MLA Rajesh Pawar absence in Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary celebrations meeting
Political News : नायगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नियोजनासाठी आयोजित भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महत्त्वाच्या बैठकीकडे स्थानिक आमदार राजेश पवार यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) खळवळ उडाली आहे. दलित होत असून, पक्षांतर्गत असंतोष उघडपणे समोर येत आहे.
नरसी येथील शासकीय बिलोली तालुक्यांतील कार्यकर्ते उपस्थित व होते. बैठकीस आमदार पवार यांच्यासह मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस पंडित सूर्यवंशी आणि जिल्हा सरचिटणीस पूनम पवार या उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आमदारांच्या अनुपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय नेते मोठे झाल्यानंतर आपली माणसं आणि विचारधारा विसरत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : नांदेडमध्ये RSS विरुद्ध खासदार; संघ पदाधिकाऱ्यांचे अनावृत पत्र व्हायरल
अनुपस्थितीने संघटनेवर प्रश्नचिन्ह
दलित समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवणे हे अत्यंत खेदजनक असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या पाठबळावर निवडून आलेल्या आमदारानीच अशा कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड आणि माणिकराव लोहगावे यांनीही अलग उपस्थिती लावून बैठक सोडल्याची चर्चा असून, त्यामुळे नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.
ही बैठक मौचर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मनोहर पवार याच्या नेतृत्वाखाली पार पडली, बैठकीत बुधनिहाय डॉ. आंबेडकर जयती साजरी करण्याचे नियोजन, संघटनात्मक आढावा आणि आगामी कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. मात्र, अपेक्षित नेत्यांची अनुपस्थिती आणि कमी उपस्थितीमुळे बैठकीचा प्रभाव फिका पडल्याचे दिसून आले. पक्ष संघटनेच्या बळाबाबतही प्रश्न उपस्थित होत असून, स्थानिक पातळीवरील नाराजी पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : श्रेयवादाचे राजकारण, भाजपात नाराजी; पक्ष संघटना कमकुवत अन् कार्यकर्ते निरुत्साही
बैठकीचा फज्जा
कार्यकत्यांत नाराजी वाढली भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या बैठकीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावल्याची चर्चा असून, त्यामुळे संघटनात्मक ताकदीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. बैठकीस दलीत कार्यकत्यांचा निरुत्साह पाहून बैठकीस कार्यकर्त्यांची कमी संख्या लक्षात घेऊन आमदार मोहद्यांनी या बैठकीस अनुपस्थिती दर्शवल्याची चर्चा उपस्थित भाजप कार्यकर्त्यांत केली जात असून, यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.