
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
भोंदूगिरी, तंत्र-मंत्र आणि इतर गंभीर आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या अशोक खरात यांच्या संपर्कात अनेक बडे नेते होते, अशी चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊतांनी थेट निशामा साधत म्हणाले की, “जर सरकार अशोक खरात यांच्या पाठीशी नसते, तर त्यांच्या ठिकाणी जाणाऱ्या सुमारे 40 आमदार, खासदार आणि मंत्र्यांची यादी सरकारने जाहीर केली असती.” यावेळी ते पुढे म्हणाले की, “भोंदूबाबापेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी हे अधिक मोठे गुन्हेगार आहेत.” त्यामुळे या सर्व संबंधितांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
अशोक खरात हा भोंदू बाबा तर आहेच. सोबतच दीपक केसरकर, एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवा. सोबत खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, यांचीही चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे. देशाचे बडे नेते अमित शाह यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहचला याची ही चौकशी व्हायला हवी अशी मागणी राऊतांनी केली आहे
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद आणि खरातची चौकशी यासगळ्यात बरेच गोष्टी समोर आल्या आहेत. यावेळी दिलेली उडवाउडवीची उत्तरे यावरून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. “अशोक खरात हा मास्टरमाईंड असून तो पोलिसांना तपासात अजिबात सहकार्य करत नाही. तो उडवाउडवीची उत्तरे देतो,” अशा शब्दांत सरकारी वकिलांनी खरातच्या वर्तणुकीचा पाढा वाचला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातची 1 एप्रिलपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.